*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*
*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*
दहिवेल(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांच्या अंतर्गत दहिवेल येथे 2026 -27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्यू.ब. यो.) अंतर्गत आदिवासी भागातील रानभाजी, रानफळे वनौषधी आणि अन्नधान्य विक्री प्रोत्साहन व आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने. याचे कार्यक्षेत्र अंतर्गत आठवडी बाजार दहिवेल येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच प्रकाश वळवी, उपसरपंच रंजना बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच नंदकिशोर महाले, अशोक बच्छाव, सामाजिक कार्यकर्ता कन्हैयालाल माळी, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान धुळे धुळे जिल्हाप्रमुख गणेश गावित, स्मारक समितीचे अध्यक्ष संदिप बच्छाव, संजय बच्छाव, सुनील बच्छाव, पुष्पा सोनवणे, अवंती देशमुख, मंजुळा भोये, प्रकल्प कार्यालय प्रतिनिधी सागर पवित्रकार, गृहपाल जे. एस.सोनवणे, एस.व्ही
पाटील, एस.बी. सोनवणे, एस बी.बागुल, सनी पाटील, मनू.राठोड आधी कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते आदिवासी भागातील पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पोषणमूल्य आणि आरोग्यविषयक फायदे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात परिसरात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. यामध्ये पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या विविध रानभाज्यांचा समावेश होता. स्थानिक महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रानभाज्यांची माहिती तसेच त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांचे सादरीकरण केले. रानभाज्यांमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्वे, खनिजे व इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक आहारपद्धतीपासून दुरावलेल्या नव्या पिढीला रानभाज्यांचे महत्त्व समजावे, तसेच स्थानिक पातळीवरील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन व्हावे, हा महोत्सवामागील प्रमुख उद्देश होता. यावेळी उपस्थितांनी विविध रानभाज्यांच्या प्रदर्शनाची पाहणी करून त्यांची माहिती घेतली. आयोजकांच्या वतीने रानभाज्यांचे संवर्धन, पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि पौष्टिक आहाराचा प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले. महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



