*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
*राजापूरातील कोळवणखडीचे शेतकरी नागेश बने यांनी पटकावला भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथील शेतकरी नागेश रामभाऊ बने यांनी कृषी विभागामार्फत आयोजित सन 2025 खरीप हंगाम स्पर्धेतील भात पीक स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
कृषी विभाग व प्रकल्प संचालक आत्मा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 14 आॅगस्ट 2026 रोजी जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव, पाककला स्पर्धा व पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम माळ नाका, विवेक हाॅटेल रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील भात पीक स्पर्धेतील विजेत्या शेतक-यांचा सन्मान करण्यात आला. कोळवणखडी येथील शेतकरी नागेश बने यांनी भात पिकामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय. प्रथम क्रमांकांचा सन्मान मिळाला. त्यांच्या या यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित. कृषी पध्दती, पिकाचे योग्य नियोजनाचा अवलंब करून भातशेती उत्पादनात वाढ केली. जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



