*30 जुलैला 'नशामुक्त युवा-विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*30 जुलैला 'नशामुक्त युवा-विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन*
*30 जुलैला 'नशामुक्त युवा-विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत 'माय भारत केंद्र, नंदुरबार' यांच्या वतीने जिल्ह्यात 30 जुलै 2026 रोजी जी. टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार येथे "नशामुक्त युवा-विकसित भारत" या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. असल्याची माहिती माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविणे तसेच कला, संस्कृती, साहित्य, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुणांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धांचा मुख्य उद्देश असून या जिल्हास्तरीय महोत्सवात लोकगीत, समूह नृत्य, पथनाट्य/मूकाभिनय, चित्रकला, वक्तृत्व, लघुपट/रील निर्मिती, घोषवाक्य लेखन आणि स्लॅम पोएट्री (काव्य सादरीकरण) अशा विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. युवकांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून "व्यसनमुक्त समाज व विकसित भारत" हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवावा, या संकल्पनेतून या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच 15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असेही आवाहन जिल्हा युवा अधिकारी, पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



