*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*
*खारपाडा टोलनाका व मुंबई गोवा महामार्गा संदर्भात जनआक्रोश समिती शिष्टमंडळाने घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट*
मुंबई(प्रतिनिधी):-जनआक्रोश समितीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची खारपाडा टोलनाका व मुंबई-गोवा महामार्ग संदर्भात भेट घेतली. यावेळी मंत्र्यांनी सदर महामार्गाचा हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अखत्यारित येत असल्याने संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सांगितले. दरम्यान, आज NHAI कडून काही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. या कागदपत्रांचे प्राथमिक अवलोकन केल्यानंतर असे दिसून येते की आवश्यक परवानग्या व प्रक्रियांची पूर्तता झाल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध नसताना केवळ दिल्ली येथून आदेश प्राप्त झाल्याच्या आधारावर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. जनआक्रोश समितीची भूमिका स्पष्ट आहे की, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात घालून, महामार्गावरील अनेक कामे अपूर्ण असताना टोलवसुली सुरू करणे अन्यायकारक व अस्वीकार्य आहे. महामार्ग पूर्णत्वास न नेता आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी न करता प्रवाशांकडून टोल आकारणे योग्य ठरत नाही.
खारपाडा टोलनाका तात्काळ बंद करून सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया, सुरक्षा निकष व महामार्गावरील उर्वरित कामे पूर्ण करण्यात यावीत, ही आमची मागणी कायम आहे. अन्यथा, प्रवाशांच्या हितासाठी व कायदेशीर बाबींची पडताळणी करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा मार्ग अवलंबेल असा इशारा जनआक्रोश समितीने कोकणकर जनतेच्या वतीने दिला आहे.



