*पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार किरण सामंत यांनी फणस रोपाचे केले वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार किरण सामंत यांनी फणस रोपाचे केले वाटप*
*पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार किरण सामंत यांनी फणस रोपाचे केले वाटप*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालूक्यातिल तळवडे जिल्हा परिषद विभाग या विभागात मंगळवार सकाळी अकरा वाजता तालुका प्रमुख दिपक नागले यांच्या हस्ते
शाखाप्रमुखांना व इत्तर शिवसैनिक यांना प्रभावती हॉल तळवडे येथे फणस कलम याचे वाटप केले गेले. सध्या राजापूर, लांजा या दोन्ही तालुक्या मध्ये पर्यावरचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम आमदार किरण सामंत यांनी ही संकल्पना राबवणाचा कल रचला आहे. आणि त्या संकल्पने साठी अति मेहनत घेवून काम करत आहेत ते तालूका प्रमुख दिपक नागले व साईराज कोलते हे अग्र स्थानी दिसत आहेत असे बोलण्यास वावगे ठरनार नाही. ह्या फणसाचे झाड लावल्या पासून तिन वर्षात उत्पन्न दयायला सुरुवात करते. त्या मध्ये दोन जाती कापा, आणि बरका असून त्यामध्ये लाल रंगाचा गरा असणारा फणस जात सुद्धाआहे. दोन्ही तालुक्यात
केवळ राजकीय आणि सामाजिक कार्याचा विस्तार न करता, पर्यावरणाचा पण त्या बरोबर विचार करण्यात येत आहे. कृषी समृद्धीला चालना देण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी एक हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे हे जनतेला आपल्या कामातून दिसून येण्यासारखे काम करत आहे. असे प्रतिपादन शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपक नागले यांनी जनतेला आपल्या भाषेतून पटवून दिले. प्रत्येक गावातिल शाखा प्रमुख व बुथ प्रमुख यांना फणस कलमांचे रोप देवून ते रोप लावण्यास पाचारणा केली गेली. तालूका प्रमुख दिपक नागले या वेळी पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. तळवडे जिल्हा परिषद गटातील सर्व शाखाप्रमुख यांनी फळशेतीकडे प्रोत्साहित व्हावे त्या साठी त्यांना प्रत्येकी 5 फणस फळझाडांचे वाटप करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात
'हरित आणि समृद्ध मतदारसंघ' व्हावा या साठी आमदार भैय्या सामंत यांच्या संकल्पनेचा शुभारंभ आज एका विशेष कार्यक्रमात करण्यात येत आहे.
"केवळ घोषणाबाजी करून पर्यावरण सुधारणार नाही, तर त्यासाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे. आपले शाखाप्रमुख व बुथ प्रमुख हे तळागाळातील जनतेशी जोडलेले असतात. त्यांनी स्वतः आपल्या परिसर किंवा शेतात ही झाडे लावून फळशेतीची सुरुवात केल्यास, संपूर्ण गावासाठी तो एक आदर्श ठरेल, असे आपले मत सामाजिक कार्यकर्ते अॅड. साईराज कोलते यांनी आपले बोलताना मत व्यक्त केले. त्या प्रसंगी त्यांनी हे ही
सांगितले की हे फणसाचे रोप फळ देताना सुरुवातिला सात किलो एवढे देते नंतर फुढे नऊ किलोग्रॅम असे फळ देत वर्षाला 70 ते 80 किलो उत्पन्न देवून दर वर्षाला उत्पन वाढतच जाते असे हे फणस कलम रोप आहे. त्या मूळे तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाला एक नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरेल, असा विश्वास जनता वर्गाला ठरेल. या प्रसंगी युवासेना सुनिल गुरव यांनी सुद्धा भाषण करताना नुसते फणस लावू नका तर ते पूर्णता जगवून दाखवा पुढील वर्षी एक अनोखी मोहीम राबवली जाईल की कुणाचे झाड सुधृड, व्यवस्थित असेल त्याला माझ्या कडून योग्य ते बक्सीस दिले जाईल याची सुद्धा सर्वानी नोंद घ्यावी. या प्रसंगी उपस्थित मान्यवर तालुका प्रमुख
दिपक नागले, जिल्हा परिषद सदस्या सिध्दांली मोरे, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, सौ. समिक्षा वाफेलकर, पाचल विभाग संघटक आत्माराम सुतार, पाचल सरपंच बाबालाल फरास, विभाग प्रमुख, शैलेश साळवी, अमर जाधव, युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव, युवासेना विभाग प्रमुख युवराज मोरे, उपविभाग प्रमुख उदय राणे, रविंद्र सावंत. तसेच सर्व शाखा प्रमूख, बुथ प्रमुख, आणि सर्व शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.



