*स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही रस्त्याची दुरवस्था रुग्णांची झोळी खांद्यावर घेऊन करावा लागतो खडतर प्रवास*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही रस्त्याची दुरवस्था रुग्णांची झोळी खांद्यावर घेऊन करावा लागतो खडतर प्रवास*
*स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही रस्त्याची दुरवस्था रुग्णांची झोळी खांद्यावर घेऊन करावा लागतो खडतर प्रवास*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-देश चालला डिजिटल क्रांतीकडे आणि कोकणी माणूस आजही रुग्णाला वाहतोय खांद्याकडे अशी काहीशी अवस्था कोकणातील गाव वाडयांची आहे. देश स्वतंत्र झाला, नेते आले गाड्या आल्या विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा झाल्या, पण रत्नागिरी जिल्ह्यातील आमच्या गावाला हक्काचा पक्का रस्ता देणारा कोणी 'कैवारी' अजून जन्माला आला नाही अशी व्यथा मौजे ओझरवाडी, तिवरे तर्फे देवळेतील ग्रामस्थ विलास रामाणे यांनी मांडली रामचंद्र रामाणे सध्या गंभीर आजारी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज आहे. पण ओझरवाडीत जायला आणि तिथून बाहेर पडायला आजही गाडी जाईल असा पक्का रस्ता नाही. स्थानिकांनी रस्ता करण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा दिली, पण हा कच्च्या रस्ता होऊन आज तब्बल 8 वर्षे झाली, तरीही याचं डांबरीकरण झालेलं नाही. आज परिस्थिती अशी आहे की, आजारी वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी त्यांना एका कपड्याच्या झोळीत (झोपाळ्यासारखं करून) टाकून, 500 मीटरचा खडतर डोंगर- दऱ्यांचा रस्ता खांद्यावरून चालत पार करावा लागत आहे6अशा बिकट परिस्थितीतून जर वाटेत काही अघटित घडलं तर याला जबाबदार कोण ?ओझरवाडीतील ग्रामस्थ विलास रामचंद्र रामाणे यांनी मायबाप शासन, खासदार, आमदार, जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य यांना सवाल केला आहे, की आम्ही फक्त निवडणुकीत मतदान करण्यापुरतेच नागरिक आहोत का? आमच्या करामधून (Taxes) मोठा विकास होत असेल, तर तो आमच्या घरापर्यंत का पोहोचत नाही? दुनिया चंद्रावर चालली आहे आणि आम्ही कोकणी माणूस आजही रुग्णाला खांद्यावर वाहून नेतोय, हीच का आमची प्रगती?"
शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आमच्या ओझरवाडी या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे आम्हाला दिलासा द्यावा अशी कळकळीची विनंती ओझरवाडीचे त्रस्त ग्रामस्थ विलास रामाणे यांनी केली आहे.



