*जामदा प्रकल्प काजिर्डा येथे मुंबईकर आणि गावकरी यांची विषेश सभा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जामदा प्रकल्प काजिर्डा येथे मुंबईकर आणि गावकरी यांची विषेश सभा संपन्न*
*जामदा प्रकल्प काजिर्डा येथे मुंबईकर आणि गावकरी यांची विषेश सभा संपन्न*
पाचल(प्रतिनिधी):-तालुक्यातील काजिर्डा या गावी जामदा प्रकल्प होवू घातलेल्या गावा मध्ये नुकतिच प्रकल्पा बाबत मुंबईकर आणि गावकरी वर्ग मिळून संयुक्त विषेस सभा झाली. सदर सभेचे अध्यक्ष पद माजी सरंपच चंद्रकात शिंदे यांना देण्यात आले, यावेळी धरणाच्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आल्या व ठोस सर्वांच्या मताने निर्णय घेण्यात आले. संभाशन करताना शासनाचा 2013 चा कायदा काय बोलतो आधी पूनर्वसन मग धरण या अनुशंगाने 2013 चा जिआर (कायदा) लागू करण्यात यावा. असे मुंबई मंडळाचे अध्यक्ष जयवंत कांबळे यांनी जनतेला पटवून दिले. यावेळी बोलताना जयवंत कांबळे यांनी सांगितले की 100 % शासकिय पूनर्वसन करण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या मागणी नुसार पूनर्वसन गावठन निच्छित करण्यात यावे. त्यासाठी कुंटूबांचा सर्वे करून यादी तयार करणे व त्या यादीचे चावडी वाचन करण्यात यावे. असा ठराव संयुक्त बैठकीमध्ये एकमुखाने करण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्य किशोर आर्डे यांनी आपल्याला जमिनीचा भाव काय असावा. हे लोकांना रितसर पटवून दिले. जर का मूर सांडवामध्ये एक जमिनीला व झाडाझुडपांना एक दर मिळत असेल आणि काजिर्डा गावामध्ये बेघर होणार्या शेतकर्याला अमिष दाखवून वेगळा दर देत असतिल तर आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. असा प्रश्न उपस्थित केला.
प्रकल्पग्रस्त राजाराम तोडकरी यांनी अधिकाऱ्यांना अनेक पत्र देवून माहिती मागवण्याचा प्रयत्न केला. त्या मध्ये 18 नागरी सुविधा कशा असाव्यात, संकलन यादी तयार केली का? असे अनेक मुद्दे घालून पत्र दिली पण आज तगायत त्याचे मला अधिकारी वर्गाने उत्तर दिले नाही. परंतु गावचे खोटे पुढारी हाताशी धरून खोटी पत्र मात्र शेतकरी वर्गाला पाठवली असे तोडकरी यांनी संभाषण व्दारे जनतेला दाखवून दिले. वेताळदेव मंडळ अध्यक्ष आणि मुंबई सरकार मान्य असलेले इंजिनियर नितिन आर्डे यांनी सोशल मिडीया अशोसियन मार्फत (S. I. A.) सामाजिक परिनाम अहवाल कायद्याचा अभ्यास सांगत धरण रद्द सुद्धा करता येते. असे दाखवून दिले. त्या नंतर 1999 च्या कायदया प्रमाणे जर का एक जूटीने अहवाल गावाचा तयार करून दिला तर धरण रद्द होवू शकते हे पटवून दिले. आणि इथून पुढे ग्रामपंचायत काजिर्डा यांच्या मार्फतच पत्र व्यवहार झाला पाहिजे. तरच तो ग्राह्य धरला जाईल अन्यता कोणतेही पत्र गावामधील पुढारी मार्फत आलेले पत्र मान्य केले जाणार नाहीं. असा ठराव करण्यात आला.
आमची जमिन मणजे कर्म भूमि, जन्म भूमि, माता भूमि आहे. त्या भूमिचे आम्ही भूमिपूत्र आहोत. असे सांगताना सुरेश पवार कुठेही ढळले नाही. 1500 शे. कोटीवर प्रकल्प जाताना अनेक घोटाळे, जसे सिंचन घोटाळे किती प्रकारे आहेत त्याचे गणित करता येणार नाही असे दाखवून देताना पालघर जिल्ह्याचे आर. पी. आय.चे अध्यक्ष मानाजी कांबळे यांनी सुद्दा अनेक भोगस मुद्दे दाखवून दिले. त्याप्रसंगी सर्वांच्या मताने एकच ठराव करण्यात आला की जो पर्यंत शासकिय पूनर्वसन, मिळनार्या शासकिय सुविधा 2013 चा जिआर चा लेखी प्रत शेतकर्यांना मिळत नाही. तोपर्यंत धरणाच्या कामाला आमचा जाहीर विरोध राहिल असे ठरावण्यात आले.
संयुक्त मिटींगला मुंबईकर व गावकरी जवळ जवळ 150 लोक वर्ग हजर होते. त्या प्रसंगी अध्यक्ष, चेहकांत शिंदे, जयवंत कांबळे, महादेव कांबळे, मानाजी कांबळे, अतुल कांबळे, शरद कांबळे, संतोष कांबळे, राजाराम तोडकरी, तुकाराम नारकर, विजय घाग, नितिन घाग, चंद्रकात राणे, मनोहर राणे, राजेंद्र गांधी, नितिन आर्डे, किशोर आर्डे, सचिन पाटेकर, पिंट्या आर्डे, दिपक आर्डे, नितिन काजारे, पोलिस पाटील रामचंद्र आर्डे, सचिव - संतोष सुतार, ह्या सर्वाच्या मताने मिटींग पार पडली.



