*डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमाने, भूमी सुपोषण एवं, संरक्षण जन अभियान व खरीप पिक हंगामपूर्व नियोजन कार्यक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमाने, भूमी सुपोषण एवं, संरक्षण जन अभियान व खरीप पिक हंगामपूर्व नियोजन कार्यक्रम*
*डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमाने, भूमी सुपोषण एवं, संरक्षण जन अभियान व खरीप पिक हंगामपूर्व नियोजन कार्यक्रम*
नंदूरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण एवं संरक्षण जन अभियान व खरीप पिक हंगामपूर्व नियोजन कार्यक्रम दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सिलेज फार्मर प्रोड्युसर कंपनी, खांडबारा येथे यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात मा. जयंत उत्तरवार (विषय विशेषज्ञ) यांनी भूमी सुपोषण अभियानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच कृषि अभियांत्रिकी, पोषक तत्त्वांचे संतुलन आणि शाश्वत शेती याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशपाल पटेल (संचालक, डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार) होते. विशेष अतिथी म्हणून सौ. अर्चना सुरूपसिंग वळवी (संचालक, डॉ. हेडगेवर सेवा समिती, नंदुरबार) राजेंद्र दहातोंडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, केव्हीके नंदुरबार) तसेच प्रमोद पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमात “जय मल्हार महिला बचत गट, श्रावणी”, सौ. मनिला वळवी (खैरवे), सौ. प्रमिला संदीप कोकणी (श्रावणी), भारत लक्ष्मी कन्या समिती (खांडबारा) आणि सौ. अर्चना सुरूपसिंग वळवी (पालपीडा) यांचा कृषि क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. तांत्रिक मार्गदर्शनात उमेश पाटील (कृषीविद्या) आणि सौ. आरती देशमुख (गृहविज्ञान) यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रविण चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून प्रक्रिया उद्योग, नैसर्गिक शेती, शाश्वत शेती, भूमी सुपोषण आणि पिक नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.



