*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
*भूमी सुपोषण मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कोठडे येथील भूमी सुपोषण कार्यक्रमात विविध संस्थांचा सहभाग डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार द्वारे कोठडा ता. नंदुरबार येथे भूमीसुपोषण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात लुपिन फाउंडेशन, सेवावर्धिनी, पुणे, सीवायडीए इंडियन ग्रामीण सर्विसेस, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर आदी संस्थेचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच मनेश पाडवी उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ञ पद्माकर कुंदे यांनी भूमी सुपोषणाद्वारे मानवी आरोग्य उत्तम राहू शकते असे प्रतिपादन केले भूमिसुपोषणासाठी रासायनिक खते व औषधी कमी करून सेंद्रिय निविष्ठा, जैविक घटकांचा वापर नैसर्गिक शेती उपयुक्त असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना श्री संदिप कुवर यांनी भूमी सुपोषणाचे महत्त्व व गरज याविषयी माहिती सांगितली. डॉ. वैभव गुरवे, उद्यानविद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यांनी फळे व भाजीपाला पिके नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने कशा प्रकारे घेता येतील याविषयी मार्गदर्शन केले.
इंडियन ग्रामीण सर्विसेस संस्थेचे यश सोनवणे यांनी शेतीतील नुकसान टाळण्यासाठी परिसरात सुरू केले हवामान केंद्राची माहिती देऊन अॅपचा उपयोग कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. सेवावर्धिनी, पुणे संस्थेचे भोजराज शेंडे यांनी सेंद्रिय खतांचा वापर करून भूमी सुपोषण कसे करता येईल याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दरम्मान गावातील प्रतिष्ठित शेतकऱ्यांनी भूमिपूजन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. शीतल शाक्य कु. अश्विनी पाडवी, सौ. लक्ष्मी वळवी, सौ. अलका वसावे आणि जयंत पाडवी यांनी विशेष प्रयत्न केले.



