*महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय कार्यालयांत साजरी करा महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय कार्यालयांत साजरी करा महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
*महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय कार्यालयांत साजरी करा महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अनेक वर्षांपासून मंत्रालयासह राज्यात सर्वत्र क्रांतीसुर्य, थोर समाज सुधारक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी होत आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्येही महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त प्रतिमापूजन आणि सामाजिक उपक्रम राबवावेत, अशी मागणी महाराष्ट्र बसव परिषदेने केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे आणि पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की थोर समाज सुधारक, महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती यंदा रविवारी (ता. 19 एप्रिल 2026 ) अक्षयतृतीयेच्या दिवशी आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाला 2007 मध्ये महाराष्ट्र बसव परिषद नंदुरबार जिल्हा शाखेने पत्र देण्यात आले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी प्रशासनाला आदेश देऊन जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय वगळता इतर कुठल्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयांत महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन होत नसल्याचे दिसून येत आहे. मंत्रालयासह राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांत जयंती साजरी करण्याचे आदेश शासनाने यापूर्वी काढले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील सर्वच कार्यालयांत हा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक सूचना करून अंमल बजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. लिंगायत धर्माचे संस्थापक, क्रांतिसूर्य, थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत अक्षयतृतीयेच्या तिथीनुसार प्रतिमापूजन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे व जी. एस, गवळी, राजेंद्र लगडे, भटू गवळी, पांडुरंग यादबोले, प्रकाश घुगरे, डी. सी. गवळी, रणजीतसिंग राजपूत, बी.डी. गोसावी, संभाजी हिरणवाळे, जितेंद्र जगदाणे, वैभव करवंदकर आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे.



