*बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित केलेला सामूहिक मौंज मेळावा उत्साहात व विधिपूर्वक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित केलेला सामूहिक मौंज मेळावा उत्साहात व विधिपूर्वक संपन्न*
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित केलेला सामूहिक मौंज मेळावा उत्साहात व विधिपूर्वक संपन्न*
नांदेड(प्रतिनिधी):-अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ जिल्हा शाखा नांदेडने आयोजित केलेला चौथा सामूहिक मौज मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत 3 एप्रिल रोजी उत्साहात व विधी पूर्वक संपन्न झाला. या उपक्रमामुळे ब्राह्मण समाजातून व बटूंच्या पालकातून आयोजकांवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. अखिल भारतीय बहू भाषिक ब्राह्मण महासंघ शाखा नांदेड समाजासाठी विविध काही उपक्रम आयोजित करून सामूहिक मौंज मेळाव्याचे आयोजन करत असते. यावर्षी सामूहिक मौंज मेळाव्याचे चौथे वर्ष होते. हा मौंज मेळावा 3 एप्रिल रोजी साई लॉन्स मालेगाव रोड नांदेड येथे संपन्न झाला. या मेळाव्यास बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे यांची विशेष उपस्थिती होती. या मौंज मेळाव्यात चैतन्य प्रशांत देशपांडे, आयुष गजानन वैष्णव, दिव्यांश बालाजीराव कुलकर्णी, वेदांत संजय मेहुणकर, प्रज्वल प्रशांत जोशी, गौरव समीर पांडे, अन्वित गजानन कुरुमभट्टे या सात बटूंवर उपनयन संस्कार संपन्न झाले. या संस्कारात मुख्य पुरोहित सतीश पोद्दार गुरुजी व रवी गुरु अंबुलगेकर गिरीश गुरु वाढोणकर यांनी शांतिपाठ करून व मंत्रोचारात मौंज संस्कारास सुरुवात केली. सर्व उपनयन संस्कार विधिपूर्वक संपन्न झाला. मात्र भोजन, भिक्षा व नंतर मिरवणुकीने मौंज मेळाव्याची सांगता झाली. या मौंज मेळाव्यास महासंघ महाराष्ट्र महिला संघटक सौ. सरला शेष, नगरसेवक अॅड. महेश कनकदंडे, अ. भा. ब्रा. महासंघ अध्यक्ष निखिल लातूरकर, नगरसेविका कु. शांभवी साले, नगरसेविका बिलोली सौ. मैथिली कुलकर्णी, नगरसेवक अशीष नेरळकर, बाळासाहेब पांडे, भरत रेनापुरकर, अॅड. गंगाबिषण कांकर, शितल खांडील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या सामूहिक मौंज मेळाव्यास साई लॉन्सचे मालक संजय औरादकर व सुभाषराव कल्याणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सामूहिक मौंज मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष बंडोपंत कुंटूरकर, महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख सखाराम कुलकर्णी, संघटक प्रा. रमाकांत जोशी चिखलीकर, दत्तात्रय पारखे, श्रीनिवास देशपांडे, गोविंदराव चौधरी, जगदीश कुंटूरकर, संजय गौतम,अॅड. रमेश राजुरकर, पत्रकार कृष्णा उमरीकर, रघुनाथ सरदेशपांडे, सुरेश बिंदू , सौ कुंटूरकर, सौ जोशी चिखलीकर, सौ. मृणाल कुंटूरकर आदी पदाधिकाऱ्यांनी मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले होते. हा मौंज सोहळा उत्साहात व विधीपूर्वक संपन्न झाल्यावर बटूंच्या पालकांनी व उपस्थित मान्यवरांनी तसेच ब्रह्मवृदांनी आयोजक टीमचे कौतुक करून शुभेच्छाचा वर्षाव केला.



