*तब्बल 27 वर्षानंतर त्यांनी पाहिला गाव! जैन मुनी अमोघकिर्ती, अमरकीर्ती महामुनीश्रींचे, ग्रामस्थांपर्यंत जय घोषवाद्यांच्या गजरात स्वागत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तब्बल 27 वर्षानंतर त्यांनी पाहिला गाव! जैन मुनी अमोघकिर्ती, अमरकीर्ती महामुनीश्रींचे, ग्रामस्थांपर्यंत जय घोषवाद्यांच्या गजरात स्वागत*
*तब्बल 27 वर्षानंतर त्यांनी पाहिला गाव! जैन मुनी अमोघकिर्ती, अमरकीर्ती महामुनीश्रींचे, ग्रामस्थांपर्यंत जय घोषवाद्यांच्या गजरात स्वागत*
कुसुंबा(प्रतिनिधी):-कुणाला नोकरीनिमित्त तर कुणाला रोजगारासाठी आपले गाव सोडून जावे लागते. अनेक जण परदेशात स्थायिक होतात पण गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. कधी एकदा आपण गावात पोहोचतो अशी त्यांची अवस्था असते. कुठल्याही कारणाने का होईना ती सुप्त इच्छा त्यांच्या गावाकडे ओढुन आणते मात्र ज्यांनी समस्त परीग्रहाचा काम, क्रोध, माया, लोभ आणि मत्सर दिगंबरत्व धारण केले आणि या षडरिपुंवर मात केली. त्यांना शाश्वत सुखासाठी कडे अर्थात मोक्षमार्गाकडे परमेश्वराशिवाय कशाचीच आसक्ती नसते. अठ्ठावीस मूल गुण पालन करणारे (षडरिपुंवर मात केलेल्या) अशाच एका दिगंबर जैन मुनींनी तब्बल 27 वर्षानंतर (दिगंबर मुनी दीक्षा घेतल्यानंतर) पुर्वीश्रमीचे मामांचे गाव जेथे शालेय शिक्षण घेतले आणि मोक्ष. मार्गपथाकडे जाण्याची ज्यास्थळी प्रेरणा मिळाली आणि निस्वार्थी गुरू मिळाले ज्यांच्याकडे मी बाराखडी शिकलो अशा गुरुजनांच्या गावात प्रवेश केला. ग्रामस्थांपर्यंत ढोल ताशांच्या आणि बँड पथकाच्या वाद्याने जयघोषचा गजरात उस्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख आणि 1008 कुंथुनाथ भगवान प्राचीन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त सतीश वसंतीलाल जैन कुसुंबा यांनी दिली. कुसुंबा हे गाव मुनीश्रींचे मामांचे गाव मूळ रहिवासी पारोळा आणि अमरकिर्ती मुनीश्रींचे सोनगीर जन्मगाव अशा दोन्ही यूगल मुनी यांनी 1999 मधे जैन धर्माची दीक्षा घेतली दीक्षा घेतल्यानंतर तब्बल 27 वर्षानंतर त्यांचे नगरात आगमन झाले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने त्यांच्या दर्शनासाठी उपस्थित होते. त्यांच्या आगमनानिमित्त गावात ठिकठिकाणी डिजीटल बॅनर झळकले. विविध प्रत्यक्ष प्रत्येक प्रथापरंपरेनुसार धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामुळे महावीर मार्ग गजबजला होता. म्हणून मुनीश्रींची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पार्श्वनाथ सेवा समितीने अत्यंत देखणे नियोजन केले. जयघोषाने
नगरी गजबजली होती महाराजांनी प्रवचन दिले त्यात त्यांनी अहिंसा मार्गाचे पालन करा. जाती पंथ संत गोत्र याचा भेद न ठेवता एकजुट व्हा वैयक्तिक कार्यात विचार करावा व्यसनांपासून दूर राहा. असे आवाहन ग्रामस्थांना केले. पूर्वीचे मित्रांनी महाराजांचे दर्शन घेतले. 50 हजार किलोमीटरचा प्रवासात खान्देशाच्या पावनभूमीत जन्मलेले आणि धर्म जैन धर्माची ध्वजा देशभर फडकवणारे महानरत्न आचार्यश्री अमोघकीर्ती व आचार्यश्री
अमरकीर्ती तपस्वी महामुनीराजांनी 1999 मध्ये दीक्षा घेतल्यानंतर गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान ,उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिसा आदी राज्यात अनेक ठिकाणी अभ्यास भेदी प्राचीन क्षेत्रांना भेटी दिल्या, अनेक ठिकाणी प्रवचने दिली. आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी झालेत. यासाठी त्यांनी तब्बल 50 हजार किलोमीटरचा प्रवास पायी केला आहे.



