*देवरे विद्यालयातील तीन विद्यार्थी वीर गाथा पर्व 5.0 जिल्हास्तरावर शौर्य पुरस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयातील तीन विद्यार्थी वीर गाथा पर्व 5.0 जिल्हास्तरावर शौर्य पुरस्काराने सन्मानित*
*देवरे विद्यालयातील तीन विद्यार्थी वीर गाथा पर्व 5.0 जिल्हास्तरावर शौर्य पुरस्काराने सन्मानित*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथेल वीर गाथा पर्व 5.0 या भारत सरकारच्या संरक्षण आणि शिक्षण मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम 2025-26 शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी राबविण्यात आला. प्रकल्पांतर्गत शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या जीवनकथांवर आधारित चित्रकला, निबंध, कविता आणि मल्टिमीडिया सादरीकरणाद्वारे देशातून 1.92 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग घेतला होता. देशाच्या शूरवीरांचे बलिदान आणि इतिहासातील थोर यौद्धांच्या शौर्यगाथा विद्यार्थ्यांप्रत पोहोचवणे, तसेच त्यांच्यात नागरिकत्वाची भावना रुजवणे या उदात्त हेतूने वीर गाथा पर्व 5.0 शौर्य पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून तीन लाख 22 हजार 918 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात नंदुरबार जिल्ह्यातून निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात जिल्हा स्तरावरून चित्रकला स्पर्धेत उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावर प्रत्येकी एक विद्यार्थी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले त्यात अनुक्रमे इ.5 वीतील प्रथमेश योगेश मराठे, इ. 8 वीतील वैष्णवी घनश्याम लोहार, इ 9 वीतील दीपेश मनोहर लोहार हे विद्यार्थी जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील प्राचार्य डॉ. दीपक साबळे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी व, स्पर्धा समन्वयक अधिव्याख्याता प्रदीप पाटील यांच्या हस्ते वीरगाथा जिल्हास्तरीय विद्यार्थी शौर्य पुरस्कार प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवांकित करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भावी स्पर्धा परीक्षा उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांनी सदर उपक्रमाचे राष्ट्रीय स्तर, राज्यस्तर व जिल्हा स्तरावरील महत्त्व अधोरेखित करत सशस्त्र सैनिक दलामार्फत समर्पण करणाऱ्या शूरवीर शहीद देशभक्तांच्या कार्याचा गौरव व्हावा. या उद्देशाने होणाऱ्या वीर गाथा उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढे या स्वरूपाच्या राष्ट्रीय स्पर्धा, उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी होऊन सुयश संपादन करावे. या हेतूने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. तसेच विद्यालयातील निसर्गरम्य वातावरणाचे व विविध कार्यक्रमांचे, उपक्रमांचे व स्पर्धांचे यशस्वी आयोजन पाहून संस्थाप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक-
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.डी. साळुंके यांनी सूत्रसंचालन डी.बी. भारती तर आभार सी.व्ही.नांद्रे यांनी मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल,ए.एस.बेडसे, एम.एस. मराठे, एस.एच. गायकवाड, व्ही.बी. अहिरे, डी.बी. पाटील, एस.जी. पाटील एच.एम. खैरनार यांनी परिश्रम घेतले.



