*राज्यातील सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा देणारे कर्मचारी अधिकारी समजून, मासिक वेतन वेळेत देण्याचे व समायोजन प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश देण्याबाबत, राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरो
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यातील सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा देणारे कर्मचारी अधिकारी समजून, मासिक वेतन वेळेत देण्याचे व समायोजन प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश देण्याबाबत, राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरो
*राज्यातील सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा देणारे कर्मचारी अधिकारी समजून, मासिक वेतन वेळेत देण्याचे व समायोजन प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश देण्याबाबत, राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन*
नाशिक(प्रतिनिधी):-राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील कर्मचारी / अधिकारी यांना ब्रिटीश कालीन गुलाम न समजता राज्यातील सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवा देणारे कर्मचारी अधिकारी समजून मासिक वेतन वेळेत देण्याचे व समायोजन प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश देण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील कर्मचारी /अधिकारी यांचे दोन महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. तिसरा महिना पूर्ण होत आहे. कामावर आधारीत मोबदला कुठे सहा महिने, कुठे एक वर्ष तर कुठे दिड वर्षापासून प्रलंबित आहे. डाटा एन्टी मानधन, मोबाईल रिचार्जचा खर्च याबाबतचा अनेक जिल्हयात थांगपत्ता नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कंत्राटी / अधिकारी यांना महाराष्ट्रातील वरीष्ठ अधिकारी यांना ठेका पध्दतीने वापरायला दिले आहे काय? अशी परिस्थिती आहे.
वरीष्ठ अधिकारी यांना वाटेल तेव्हा वेतन मानधन, कामावर आधारीत मोबदला वितरीत करणार. स्पर्श वेतन प्रणाली आल्यानंतर एक तारखेला वेतन अदा केले जाईल असा प्रचार वरीष्ठ अधिकारी यांनीच केला होता. स्पर्श प्रणाली मुळे दिवाळीला वेतन न झाल्याने कर्मचारी यांचा रोष कमी करण्यासाठी संघटना पदाधिकारी विजय गायकवाड यांनी एक पोस्ट केली. दिपावली अधिकारी यांच्या घरी करायची का? तेव्हा विभागातील वरीष्ठ अधिकारी यांचा प्रचंड इगो हर्ट झाला व विजय गायकवाड यांना सेवेतून डायरेक्ट बडतर्फ करण्यात आले. आय.ए.एस. दर्जाचे वरीष्ठ अधिकारी यांना देवाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांचा इगो हर्ट झाल्यास परिणाम वाईटच होणार. त्याच वरीष्ठ अधिकारी यांचा विभागात सुरु असलेल्या अनागोंदी कारभारामुळे, विविध कर्मचारी यांच्या एकतर्फी बडतर्फीमुळे, दोन तिन महिन्याचे वेतन व वर्ष ते दिड वर्षे कालावधीचा कामावर आधारीत मोबदला न दिल्यामुळे, तसेच दोन वर्षे शासन निर्णय निगमर्मीत होवून दोन टक्के समायोजन प्रक्रीया पूर्ण न केल्याने ईगो का हर्ट होत नाही हे समजण्यापलीकडचे आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील कर्मचारी / अधिकारी हे राज्यातील महत्वपूर्ण आरोग्य सेवा देणारे कर्मचारी अधिकारी आहेत. त्यांना ब्रिटीश कालीन गुलाम न समजता, वेतन, कामावर आधारीत मोबदला व समायोजन प्रक्रीया त्वरीत करण्याचे निर्देश वरीष्ठ अधिकारी यांना देण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, निवेदनावर महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक जयसिंगपुरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



