*हातदेत ग्रामदेवतेची पालखी आता चर्मकार बांधवांच्याही घरी जाणार,तहसीलदारांचा निर्णय न्यायालयाकडून कायम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हातदेत ग्रामदेवतेची पालखी आता चर्मकार बांधवांच्याही घरी जाणार,तहसीलदारांचा निर्णय न्यायालयाकडून कायम*
*हातदेत ग्रामदेवतेची पालखी आता चर्मकार बांधवांच्याही घरी जाणार,तहसीलदारांचा निर्णय न्यायालयाकडून कायम*
राजापूर(प्रतिनिधी):-राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांनी तालुक्यातील हातदे गावातील ग्रामदेवतेची पालखी चर्मकार समाजाच्या घरी नेण्यासाठी आदेश जारी केला होता. त्यांच्या या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु न्यायालयाने तहसीलदार यांचा आदेश कायम राखण्याचा निर्णय दिल्याची माहिती श्री संत रोहिदास प्रतिष्ठान (हातदे), मुंबईचे सरचिटणीस राजेश धामापूरकर यांनी दिली. सविस्तर वृत्त असे की, हातदे गावातील चर्मकार समाजाच्या घरी फक्त रुढी परंपरा म्हणून ग्रामदेवतेची पालखी नेली जात नसे. त्यामुळे चर्मकार समाज जवळपास 150 वर्षे ग्रामदेवतेचे आपल्या घरी आगमनाचा आनंद, श्रद्धाभाव याला मुकला होता. यासाठी चर्मकार समाज ग्रामदेवतेची पालखी आपल्या घरी येण्यासाठी संघटित होऊन प्रथम गावातील मानकरी मंडळी नंतर तहसीलदार यांजकडे सातत्याने पाठपुरावा करत होता. अखेर चर्मकार समाजाच्या मागणीला यश येऊन तहसीलदार यांनी चर्मकार समाजाच्या घरी पालखी नेण्यासाठी आदेश जारी केला.
परंतु या आदेशाविरुद्ध काही मंडळींनी सत्र न्यायालय, रत्नागिरी मध्ये तहसीलदारांच्या आदेशाला आव्हान दिले होते. परंतु न्यायालयाने तहसीलदार यांचा आदेश कायम राखला. चर्मकार समाजाच्या वतीने न्यायालयात ऍड. महेंद्र वसंत मांडवकर यांनी बाजू मांडली. न्यायालय व तहसीलदार यांच्या आदेशामुळे चर्मकार समाजात आनंदाचे, उत्साहाचे व न्याय मिळाल्याची भावना आहे. या निर्णयामुळे चर्मकार समाजासोबत होणारी असमानता, भेदभाव, अस्पृश्यतेची वागणूक नाहीशी होण्यासाठी गतिशील वातावरण तयार होईल. समाजातील भेदभाव, असमानता, अस्पृश्यता दूर झाल्याने समाजात समरसता व एकजूट निर्माण होईल. अशा क्रांतिकारी व परिवर्तनशील निर्णयाचे सर्व गावांमध्ये अनुकरण व्हावे अशी अशा व्यक्त केली जात आहे.



