*दि.8 मार्च ते 22 मार्च दरम्यान जिल्ह्यात साजरा होणार 'जल महोत्सव'-प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार,पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी होणार मदत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दि.8 मार्च ते 22 मार्च दरम्यान जिल्ह्यात साजरा होणार 'जल महोत्सव'-प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार,पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी होणार मदत*
*दि.8 मार्च ते 22 मार्च दरम्यान जिल्ह्यात साजरा होणार 'जल महोत्सव'-प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार,पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी होणार मदत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी दि.8 मार्च ते दि.22 मार्च 2026 या दरम्यान जिल्हयात सर्व ग्रामपंचायत स्तरावर 'जल महोत्सव' राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिली.
गाव, पंचायत समिती स्तरावर लोकसहभागावर आधारीत लोक जल उत्सव आयोजित करणे. तसेच पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जलउत्सव संस्थांत्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा जल महोत्सवाच्या उपक्रमामागचा उद्देश आहे. राष्ट्रीय पेयजल विभाग, केंद्र शासन व नीती आयोगाच्या सहकार्याने 2024 मध्ये 20 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये जल उत्सव प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता. आता जल महोत्सव देशभर राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या योजना, स्टँड पोस्ट नळ पाणीपुरवठा योजना तसेच दरडोई किमान 40 लिटर प्रतिदिनने पूर्ण झालेल्या योजनांची दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन प्रमाणे सुधारणात्मक पुनर्जोडणी करण्यात येत आहे.
जिल्हयातील शाळा, अंगणवाड्या, अनुदानित आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांसाठी या योजनेतून नळजोडणी देण्यात येत आहे. एकाकी/आदिवासी वाडी- पाड्यांसाठी सौरऊर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. जल महोत्सव जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर अशा तीन स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. गाव आणि पंचायत समिती स्तरावर 'लोकजल उत्सव' आयोजित केला जाईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल. गावात ग्रामसभा आणि पाणी समितीद्वारे प्रत्यक्ष कृतींवर भर दिला जाणार आहे. महिलांद्वारे जल गुणवत्ता चाचणी (फिल्ड टेस्टिंग किट वापरून) केली जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिक आपल्या गावातील जलस्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणार आहेत. यात जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता केली जाणार आहे. पाणी पुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतर आणि सामुदायिक शपथ दिली जाणार आहे. ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याचा समावेश केला जाणार आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा आधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी दि.8 ते 22 मार्च 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या जलमहोत्सवात सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व सर्व ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प् संचालक आय.बी.पवार, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय पाटील यांनी केले आहे.



