*कोंडगे गावातील पालटोक धनगरवाडीची पाणीटंचाई समस्या सोडवण्याचे आ.किरण सामंत यांचे आश्वासन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोंडगे गावातील पालटोक धनगरवाडीची पाणीटंचाई समस्या सोडवण्याचे आ.किरण सामंत यांचे आश्वासन*
*कोंडगे गावातील पालटोक धनगरवाडीची पाणीटंचाई समस्या सोडवण्याचे आ.किरण सामंत यांचे आश्वासन*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे कोंडगे पालटोक धनगरवाडी या वस्तीमध्ये मार्च ते पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.विद्यमान सरपंच डॉ.एस. व्हि. कदम जानेवारी 2023 मध्ये लोकनियुक्त सरपंच झाल्यानंतर पालटोक धनगरवाडी टँकर मुक्त करण्याची भूमिका घेऊन गेली दोन वर्ष ग्राम पंचायतीने स्वनिधीतून सुमारे 70 हजार रु.खर्च करून एक तळीची खोदाई करून पाण्याचा प्रश्न सोडविला होता. परंतु या फेब्रुवारी महिन्यात अचानक पाणी कमी झाल्याचे दिसून आले. याची प्रत्यक्ष पहाणी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी आणि ग्राम पंचायतीने जागेवर जाऊन केलेली आहे. आणि पाण्याचे दुर्भिक्ष असल्याची खात्री करण्यात आली. दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी पालटोक येथील ग्रामस्थासह सरपंच यांनी मा.आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. मा.आमदार यांनी तातडीने समस्या सोडविण्याचे आदेश ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिलेले आहेत. त्यानुसार उप अभियंता श्रीम. करंडे, ग्रामीण पाणी पुरवठा, गट विकास अधिकारी, हिंदुराव गिरी, तहसीलदार यांचे प्रतिनिधी मंडळ निरीक्षक श
प्रसन्न गुरव, ग्राम पंचायत अधिकारी हेमंत मानगेकर यांनी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सयुक्तिक रित्या या ठिकाणी भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा विनिमय त्यांच्या समस्या समजून घेतल्या त्यांना कायम स्वरुपी आणि तातडीने पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याठिकाणी एखादी विंधन विहीर टंचाई आराखड्यात मंजूर करून घेणेत ग्राम पंचायतीला यश आलेले आहे. त्याप्रमाणे विंधन विहीर कोणत्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे यासाठी भूजल यांत्रिकी अधिकाऱ्यांना पाचारण करणेची प्रक्रिया सुरू आहे. पाणी टंचाईबाबत सरपंच डॉ.एस. व्ही. कदम हे सातत्याने अधिकारी यांच्या संपर्कात आहेत. आणि जोपर्यत माझ्या वंचित धनगरवाडीतील तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नसल्याचे सरपंच डॉ एस. व्ही कदम यांनी सांगितले.



