*डी.आर.हायस्कुल प्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उबाठा गटाची जोरदार मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी.आर.हायस्कुल प्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उबाठा गटाची जोरदार मागणी*
*डी.आर.हायस्कुल प्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उबाठा गटाची जोरदार मागणी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित डी.आर.हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमधील गंभीर प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे उमेश अशोक शिंदे या शिक्षकाविरुद्ध त्याच वर्गातील अल्पवयीन विद्यार्थीनीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, संबंधित शिक्षकाविरोधात यापूर्वीही तक्रार करण्यात आल्याचा दावा होत असताना संस्थेने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही, असा गंभीर आरोप पुढे येत आहे. जर तक्रारीनंतरही कारवाई झाली नसल्यास हे केवळ दुर्लक्ष नसून अक्षम्य हलगर्जीपणाचे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. सदर कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या संख्येने मुली शिक्षण घेत असून, त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी संस्थेची आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत कठोर धोरण असणे अपेक्षित असताना अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत चिंताजनक असल्याचे नागरिकांचे मत आहे. फक्त एका शिक्षकावर गुन्हा दाखल करून जबाबदारी संपत नाही. संस्थेच्या निष्क्रियतेमुळेच असे प्रकार घडतात. त्यामुळे नंदुरबार एज्युकेशन सोसायटी तसेच तिच्या कार्यकारी मंडळावरही गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी शिवसेना उबाठा गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलली नाहीत तर शाळेबाहेर ठिय्या आंदोलन, तीव्र निदर्शने करण्यात येईल. असे शिवसेना उबाठा गटाकडून सांगण्यात आले.
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी यांच्या मार्फत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख पंडित माळी, तालुकाध्यक्ष रमेश पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मन्नांन गणी सीकलीकर, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख इम्तियाज कुरेशी, प्रथमेश माळी, हरीश गुलाले, इम्तियाज खान, एजाज काझी, खंडू माळी, कल्पित नाईक, जगदीश वसावे, शेखर जाधव, वासुदेव माळी, अबू हारीश, संगीता खंडू माळी, वैशाली अहिरे, गायत्री माळी, संगीता माळी व शिवसैनिक उपस्थित होते
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी कठोर यंत्रणा उभी करण्याची मागणी जोर धरत आहे.



