*आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष का*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष का*
*आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष का*
राजापूर(प्रतिनिधी):-महावितरण कार्यालयाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा काम होत नाही प्रस्ताव बनवला जातो असं सांगितलं जातं पण तो पुढे मंजूर केला जात का नाही यामध्ये दोष कुणाचा असा प्रश्न आंगले वासियांना पडलेला असून गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास गोपाळ राऊत यांनी महावितरणच्या बेजबाबदार भूमिके बद्दल संताप व्यक्त केला आहे. महावितरण की जिल्हा नियोजन प्रशासन याला जबाबदार कोण जर जिल्हा नियोजन असेल प्रस्ताव अनेक वेळा मंजुर न करता परत महावितरण कार्यालयाकडे का पाठवतात या प्रस्तावासोबत लोकप्रतिनिधी यांचे पत्र जोडले असताना सुद्धा तो प्रस्ता पास का होत नाही याचे उत्तर कोणीतरी आम्हाला देईल का राऊतवाडी आणि वरची राऊतवाडी या दोन्ही वाड्यांमध्ये विद्युत टू फेस लाईन आहे. त्यामुळे कमी विद्युत दाबामुळे विद्युत उपकरणे चालत नाहीत व अति मंद विद्युत प्रकाश असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तरी या दोन्ही वाड्यांमध्ये विद्युत थ्री फेस लाईन जोडण्यात यावी. तसेच या वाडीमध्ये असलेला विद्युत ट्रान्सफोर्मर हा ग्रामपंचायत आंगले हद्दीतील सौंदाळकरवाडी व राऊतवाडी यांच्या मध्ये विद्युत डीपी ट्रान्सफोर्मर असून ते अडचणीच्या ठिकाणी बसविले आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी अरुंद पायवाट असून केव्हा डीपी मध्ये बिघाड झाल्यास मनुष्यबळाने वाहतूक करावी लागते या कामी गावातील ग्रामस्थ कायमस्वरूपी सहकार्य करत आले आहेत सदरची डीपी ही रस्त्यापासून 600 मी अंतरावर असल्याने अपघात झाल्यास विद्युत पुरवठा बंद करण्याकामी जाण्यास अडचणीच्या पायवाटेने जावे लागते तरी आपणास विनंती आहे की सदरची डीपी जागा बदलून रस्त्यालगत बसविण्यात यावी याकरिता महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहेत सदरची मागणी आताची नसून आज गेली तीन वर्ष करत असून त्याचप्रमाणे राऊतवाडी व राऊत वरची वाडी या दोन्ही वाडीकरिता नवीन ट्रान्सफोर्मर मिळावा याकरिता दोन्ही वाडीतील ग्रामस्थ प्रयत्न करत असून त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत हे नेहमी या कामी पुढाकार घेत असून महावितरण प्रशासनाने आमचे प्रश्न लवकर मार्गी लावावे असे आंगले गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास गोपाळ राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.



