*बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*बी.ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यशास्त्र अभ्यास मंडळ आणि जी.टी पाटील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बी. ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी क.ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे रघुवंशी होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटक क.ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर होते.तर प्रमुख अतिथी क.ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय तुंटे उपस्थित होते.
प्राचार्य प्रा. डॉ.एम. जे रघुवंशी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार तयार होणारा राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समजेल आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा असावा. स्पर्धात्मक युगामध्ये आजच्या स्पर्धेत राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल असा निर्माण करावा. जेणेकरून विद्यार्थीना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होईल. महाविद्यालयात नियमित विद्यार्थी कसे उपस्थित राहतील यासाठीमहाविद्यालयात वेगवेगळे प्रयोग करण्याचा सल्ला देऊन प्राध्यापकांनी याकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे असे मौलिक मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक आधि सभा सदस्य प्रा.डॉ. संदीप नेरकर यांनी राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना राज्यशास्त्रातील सर्व शाखांचा विचार करण्यात यावा जेणेकरून अभ्यासक्रम सर्व समावेशक होईल प्राध्यापकांना आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांना ते आव्हानात्मक होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी क.ब. चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्य राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय तुंटे यांनी राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम राज्यशास्त्रातील सर्वच घटकांचा विचार करून तो सर्वोत्कृष्ट बनवला जाईल व वर्तमान काळाशी तो कसा प्रासंगिक राहील याला महत्त्व देण्यात येईल असे म्हणाले. प्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ.एम. एस रघुवंशी यांनी राज्यशास्त्र विषय किती व्यापक आहे असे सांगून राज्यशास्त्राची महती आजच्या युगात किती महत्त्वाची आहे हे सांगितले.
कार्यशाळेच्या बौद्धिक क्षेत्रात जवळपास 15 ते 16 प्राध्यापकांनी अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपली मते मांडली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बौद्धिक सत्र पार पडले. बौद्धिक सत्राचे अध्यक्षस्थान राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. विजय तुंटे यांनी भूषविले होते. या कार्यशाळेच्या संदर्भात प्रा. यादव बोयेवार व प्रा. डॉ. सौ. मीना काळे यांनी आपली मते मांडली. या कार्यक्रमाचे प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संदीप पाटील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील राज्यशास्त्राचे अभ्यासक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डी.एम. सुपलेकर यांनी केले आणि सूत्रसंचालन कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. तारक दास यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. एस. बी. वायसे, प्रा.डॉ. सुलतान पवार, प्रा. डॉ. व्ही. जी. सोमकुवर, शप्रा. डॉ. माधव कदम, प्रा. डॉ. विजय चौधरी, प्रा. डॉ. एन.पी हुसे, प्रा. सचिन आढावे, प्रा. आशिष वाघ, हर्षबोध बैसाने, संतोष परदेशी दिलू परदेशी व राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे नियोजन राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले होते.



