*नंदुरबार सुरत सकाळी 5 वाजता सुटणाऱ्या मेमोच्या वेळेत बदल करावा, उबाठा गटाची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार सुरत सकाळी 5 वाजता सुटणाऱ्या मेमोच्या वेळेत बदल करावा, उबाठा गटाची मागणी*
*नंदुरबार सुरत सकाळी 5 वाजता सुटणाऱ्या मेमोच्या वेळेत बदल करावा, उबाठा गटाची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-रेल्वे स्टेशन वरून सकाळी 5 वाजता सोडण्यात येणारा नंदुरबार सुरत मेमोच्या वेळेत बदल करून 5.30 ही वेळ करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज शिवसेना उबाठा गटा कडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आले. नंदुरबार रेल्वे स्टेशन वरून नंदुरबार सुरत मेमो सकाळी 5 वाजता सोडण्यात येतो परंतु ही मेमोला कोळदा, नवापुर व इतर स्टेशनवर जास्त वेळ थांबविण्यात येतो कारण त्यामागुन येणारे सुपरफास्ट रेल्वे अहमदाबाद-हावडा व बरोनी एक्सप्रेस यांना मार्ग मोकळा करण्यासाठी मेमो थांबवले जातो. जर मेमो ईतर स्टेशनवर थांबवण्यापेक्षा नंदुरबार-सुरत मेमो 20 ते 25 मिनिट नंदुरबार हुन उशिराने सोडला तर लोकांना सोयीचे होईल व आपल्याला प्रवाशी जास्त मिळतील तसेच हावडा व बरोनी या गाड्यामधील गदींचे प्रमाण सुध्दा कमी होईल. तसेच ग्रामीण भागातील एस.टी.बसेस सकाळी 5 वाजता नंदुरबार स्थानकावर येत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सुध्दा या मेमो गाडीचा फायदा होऊ शकतो म्हणून. वरील विषयाचा विचार करुन नंदुरबार- सुरत मेमो सकाळी 5 ऐवजी 25 ते 30 मिनिट उशिर करुन 5 . 30 करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख पंडित माळी, अल्पसंख्याक विभागाचे उपजिल्हाप्रमुख इम्तियाज कुरेशी, युवाशहर प्रमुख शेखर जाधव, खंडू माळी, वसीम खान, इम्तियाज खान, कुणाल पवार, राजेश पवार, नैतिक करम व शिवसैनिक उपस्थित होते.



