*भारताला प्रगतीपथावर नेणारे बजेट-डॉ.समिधा नटावदकर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारताला प्रगतीपथावर नेणारे बजेट-डॉ.समिधा नटावदकर*
*भारताला प्रगतीपथावर नेणारे बजेट-डॉ.समिधा नटावदकर*
नंदूरबार(प्रतिनिधी):-आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे बजेट संसदेत सादर केले ते संपूर्ण भारताला अग्रेसर करण्याच्या दृष्टीने या सरकारने केलेल्या कामांना पुढे नेणारे आहे. या बजेटमध्ये भारताच्या तळागाळातील लोकांपासून ते महिला समृद्धी पर्यंत अनेक घटकांचा विचार करण्यात आल्याने येणाऱ्या काळात या बजेटमुळे या घटकांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉ समिधा नटावदकर यांनी केले. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण समाजाच्या विकासाचे स्वप्न साकार करणारे बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये केलेल्या प्रत्येक तरतुदीचे त्यांनी स्वागत केले आहे तसेच महिला शेतकरी युवक उद्योग या सर्व क्षेत्रांना भरारी देणारे हे बजेट आहे असेही त्यांनी नमूद केले. या बजेटमध्ये प्रस्तावित केलेल्या ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाखाली उद्योगांसाठी स्वयंसहायता उद्योजक मार्ट्स सारख्या विविध योजनांमुळे आधीच प्रगतीपथावर असलेला देश जगात स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल असे मला वाटते असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह बांधणारे योजना ही क्रांतिकारी योजना असून याने अधिकाधिक मुली उच्च शिक्षणाकडे वळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वे, बंदरे यासाठी या बजेट मध्ये असलेल्या विविध योजनांमुळे पायाभूत सुविधा, दळणवळण यात वाढ होईल व उद्योग व्यवसायाना चालना मिळेल तसेच
या बजेटमध्ये शेतीसाठी केलेल्या तरतुदीमुळे कृषी क्षेत्राला अधिक चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



