*जी. टी. पाटील महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण 2020 वर कार्यशाळेचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण 2020 वर कार्यशाळेचे आयोजन*
*जी. टी. पाटील महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण 2020 वर कार्यशाळेचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-येथील जी. टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व नंदुरबार तालुका विधायक समितीचे जी.टी.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. नंदुरबार शहरातील विविध महाविद्यालयात प्रवेशित असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक या कार्यशाळेकरिता उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम.जे. रघुवंशी होते. सोबतच संस्थेच्या समन्वयक प्रा. डॉ. एम एस रघुवंशी उपस्थित होते. अध्यक्षीय शुभेच्छा देताना रघुवंशी यांनी देशाच्या प्रगतीचे मूळ हे शिक्षण असून बदलत्या प्रवाहानुसार शिक्षणात बदल होणे गरजेचे आहे असे नमूद केले. नवीन शैक्षणिक धोरण देशाच्या प्रगतीला एक वेगळे वळण देईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेकरिता प्रमुख वक्ते म्हणून शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा डॉ आर एस पाटील, साक्री येथील सी गो पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ आर आर अहिरे, बामखेडा येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा डॉ योगेश पाटील व नतावीसचे शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा डॉ कैलास चौधरी हे लाभलेत. आर एस पाटील यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना बहुआयामी रोजगारक्षम व जगाच्या इतर विद्यापीठाच्या बरोबरीचे शिक्षण मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल असे प्रतिपादन केले. अहिरे यांनी आपल्या मनोगतातून शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्टे, व्याप्ती व आव्हाने विद्यार्थ्यांसमोर मांडलेत. योगेश पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून भारतीय ज्ञान परंपरांना उजाळा मिळेल व समृद्ध भारतीय ज्ञान परंपरा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिकायला मिळतील असे सांगितले. चौधरी यांनी नवीन शैक्षणिक धोरणात डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध असलेल्या विविध कोर्सेसला विद्यार्थ्यांनी प्रवेशित होऊन नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. दिनेश देवरे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. माधव कदम यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीते करिता प्रा. डॉ. अमोल भुयार, प्रा. एम बी पाटील, प्रा. डॉ. स्वप्नील मिश्रा, प्रा. डॉ. विजय चौधरी, प्रा. डॉ. तारक दास, प्रा सचिन आडावे व प्रा आशिष वाघ यांनी परिश्रम घेतलेत. 120 पेक्षा जास्त विद्यार्थी व पालक उपस्थित होते.



