*जी.टी. पाटील महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी. पाटील महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड*
*जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी. टी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) एककातील तीन छात्रसैनिकांची भारतीय सेनेत अग्निवीर पदासाठी निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. निवड झालेल्या छात्रसैनिकांचा महाविद्यालयात गौरवपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते निवड झालेल्या छात्रसैनिकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये विवेक उत्तम पाटील यांनी बेळगाव येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची नियुक्ती जम्मू -काश्मीर येथे झाली आहे. राहुल प्रकाश पाटील यांनी पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची नियुक्ती भटिंडा (पंजाब) येथे, तर कुणाल दत्तू पाटील यांनी सिकंदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची नियुक्ती पठाणकोट येथे झाली आहे.
महाविद्यालयासाठी व राष्ट्रीय छात्र सेना एककासाठी ही बाब अत्यंत अभिमानाची असून, सातत्याने भारतीय सेनेत निवड होणारे छात्रसैनिक घडविल्याबद्दल सर्वांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी देशसेवेसाठी अथक परिश्रम करणाऱ्या सैनिकांचे अभिनंदन करत, निवड झालेल्या छात्रसैनिकांना भविष्यात देशभक्ती व राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी मनः पूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित छात्रसैनिकांनी या यशातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी 49 महाराष्ट्र बटालियनचे हवालदार विठ्ठल यादव यांनी देखील नियुक्त झालेल्या छात्रसैनिकांचे अभिनंदन करत, बटालियनचे नावलौकिक केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
या सत्कार समारंभास राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ. सुलतान पवार, कनिष्ठ एककाचे अधिकारी डॉ. मनोज शेवाळे, क्रीडा अधिकारी डॉ. तारक दास, अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे अधिकारी डॉ. मनोहर पाटील, महाविद्यालयाचे कुलसचिव सुदेश रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट डॉ. विजय चौधरी व प्रा. राजश्री बाविस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.



