*"गोव्यातील रोमियो लेन रॅक दुर्घटनेतील अपराधींना कठोर शासन करा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"गोव्यातील रोमियो लेन रॅक दुर्घटनेतील अपराधींना कठोर शासन करा*
*"गोव्यातील रोमियो लेन रॅक दुर्घटनेतील अपराधींना कठोर शासन करा*
गोवा(प्रतिनिधी):-येथील रुद्रा बंधूंच्या मालकीच्या बेकायदा रोमियो लेन रॅक दुर्घटनेत हॉटेल भस्मसात झाले 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला हे हॉटेल इतके वर्ष बेकायदा कसे चालू होते त्याला जबाबदार कोण होते ते अधिकारी कोण ते मंत्री कोण अपराधी कोण त्यांच्यावर मनुष्य वधाचा खटला दाखल होणे व लवकरात लवकर त्या सर्वांना शिक्षा होणे आवश्यक आहे आतापर्यंत असे दिसण्यात आले आहे की चौकशी समित्या नेमल्या जातात परंतु त्यातून काहीच निष्पन्न होत नाही जनता सर्व विसरते आणि या सर्वावर पडदा टाकला जातो ज्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे त्यांना न्याय मिळत नाही त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही आणि हे कायमस्वरूपी असत चाललेले आहे जनतेने आता जागृत होऊन याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे याचे उदाहरण म्हणजे महाड मधील राष्ट्रीय महामार्गावरील पूल कोसळला एसटी बस पाण्यात वाहून गेली अनेक गाड्या वाहून गेल्या अनेक जणांचा मृत्यू झाला चौकशी समिती नेमल्या गेल्या परंतु कोणालाही शिक्षा झाल्या नाही हे दुर्दैव आहे आपले कारण आपण जनता जागृत नाही जे आपण निवडून देतो ते लोकप्रतिनिधी आपले कार्य चोखपणे करीत नाहीत पालकमंत्री नेतेमंडळी मुख्यमंत्री सर्व सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी सर्वांचे कर्तव्य असते प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष राहून आपला कारभार करणे आवश्यक आहे परंतु हे होताना दिसत नाही सर्वजण भ्रष्टाचाराने माखलेले आहेत खालपासून वरपर्यंत सर्वजण भ्रष्टाचाराने माखलेले आहेत त्यामुळे खरा न्याय कोणालाच मिळत नाही असे या गोव्यातील दुर्घटनेबाबत होता कामा नये तरच सर्व नोकरशाही व जबाबदार व्यक्तींना कठोर शासन होईल व परत अशा गोष्टी घडणार नाहीत ही जबाबदारी मुख्यमंत्री सावंत तसेच अशा गोष्टी परत घडू नये म्हणून केंद्र सरकार सर्व राज्य सरकार व हायकोर्ट सुप्रीम कोर्ट या सर्वांची जबाबदारी आहे सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या वेळेवर व तत्परतेने पार पाडल्या पाहिजेत असे श्रीकांत विठ्ठल सावंत अध्यक्ष मानवता विकास परिषद अध्यक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद कार्यवाह राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.



