*टेरव गावच्या जय भवानी ग्रामोन्नती मंडळ, मुंबईचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*टेरव गावच्या जय भवानी ग्रामोन्नती मंडळ, मुंबईचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
*टेरव गावच्या जय भवानी ग्रामोन्नती मंडळ, मुंबईचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
चिपळूण(प्रतिनीधी):-टेरव गावच्या जय भवानी ग्रामोन्नती मंडळ मुंबई या 7 वर्षाचा इतिहास असलेल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाले. स्नेह संमेलनात उपस्थित विद्यार्थ्यांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले. तसेच जय भवानी ग्रामोन्नती मंडळाच्या कार्यकारिणी समितीचे नवीन अध्यक्ष सूर्यकांत वामन कदम, उपाध्यक्ष दत्ता गंगाराम साळवी, सरचिटणीस हेमंत हरिश्चंद्र कदम, संयुक्त चिटणीस संध्या अशोक कदम, व पल्लवी चंद्रकांत कदम, खजिनदार विजय काशीराम कदम,उपखजिनदार सौ संगीता प्रकाश कदम, कार्यकारिणी सदस्य अशोक रघुनाथ कदम, विद्याधर सिताराम कदम, दत्ता मारुती कदम, सचिन हैबत कदम, दिनेश मनोहर कदम, सुपर्णा सूर्यकांत कदम, सल्लागार दशरथ पांडुरंग कदम, यशवंत बाबुराव कदम, सुधाकर कृष्णाजी कदम प्रियवंदा दशरथ कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजीत करून उपस्थित महिलांना संध्या अशोक कदम तसेच शुभलक्ष्मी (निर्मला) दत्ताराम शिंदे कादवड यांच्या तर्फे वाण देण्यात आले. तसेच महिलांसाठी लॉटरी स्वरुपात 5 बक्षिसे प्रियवंदा दशरथ कदम यांच्यातर्फे देण्यात आली. महिलांसाठी लॉटरी स्वरुपात 5 साड्या बक्षीस म्हणून सुवर्णा सुधीर शिंदे (कोळकेवाडी) यांच्यातर्फे देण्यात आल्या. संमेलनास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
मान्यवरांनी मार्गदर्शन करताना नवीन पदाधिकाऱ्यांनी आता जबाबदारी घेवून संस्थेचा नावलौकिक वाढवून भरभराट करावी असे मत मांडले. तसेच मुंबईतील संस्था आणि गावातील स्थानिक पातळीवर योग्य समन्वय साधून गावच्या सर्वांगीण विकासात हातभार लावावा असे सुचविण्यात आले. तसेच मंदिरातील धार्मिक उत्सवांसाठी स्थानिक व्यवस्थापन समितीशी समन्वय साधण्यासाठी शहरवासीयांची समिती नेमावी असेही सुचविण्यात आले. गावातील प्राथमिक शाळा व हायस्कूल यांच्याशी समन्वय साधून योग्य ते सहकार्य करावे असे मौलिक विचार मांडण्यात आले. गावाने श्री क्षेत्र टेरव मंदिराची रंग रंगोटी करण्याचे नक्की केले आहे, ते काम नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च प्रतीचे व सुबक व्हावे म्हणून सर्वतोपरी सहकार्य करावे असे ठरविण्यात आले. टेरव गावचे सुपुत्र व प्रतिथयश उद्योजक विराज कदम यांनी रंगकामासाठी 1 लक्ष रू देणगी देण्याचे जाहीर केले. तसेच मावळते अध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. लवकरात लवकर सर्वसाधारण सभेचे आयोजन करून मंडळाचा व गावचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल या बाबत विचार विनिमय करण्यात येईल असे नूतन अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी सांगितले.