*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा*
*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यवेक्षक मनीष पाडवी यांनी हिंदी दिवसाच्या प्रास्ताविकाने केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सौ. नूतनवर्षा वळवी उपस्थित होत्या. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धा, कविता वाचन, पुस्तक परिचय आणि दोहे सादरीकरण यांचा समावेश होता.
कविता वाचन या उपक्रमात कवी गुलजार यांची 'किताबे ' कविता विद्यार्थ्यांसमोर वंदना एस. जांबीलसा यांनी सादर केली तसेच तुलसीदास, कबीर आणि रहीम यांच्या दोह्यांचे सुंदर सादरीकरण रुचिता सुतार यांनी केले. त्यानंतर हरिवंश राय बच्चन यांची ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ ही प्रेरणादायी कविता स्नेहलता मोरे मॅडम यांनी सादर केली. यानंतर विद्यार्थ्यांना हिंदी साहित्याची माहिती तसेच हिंदीतील प्रसिद्ध लेखक व साहित्यिक यांच्या संदर्भातील माहिती देण्यात आली. या उपक्रमात कवी गुलजार यांच्या साहित्यकृतींचा परिचय करून देण्यात आला. हा माहितीपर उपक्रम मनीष एल. पाडवी यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. हिंदी दिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आरोही गावित व रेश्मा सोनवणे द्वितीय क्रमांक जानवी राठोड व आरती राठोड, तृतीय क्रमांक नंदनी जाधव व चिरायु गिरासे या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्या सौ. नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि वातावरणात पार पडला.विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत हिंदी दिवसाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व, हिंदी साहित्याची समृद्ध परंपरा आणि हिंदी भाषेतील साहित्यिकांचे योगदान यांची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमासाठी हिंदी विषय शिक्षक मनीष पाडवी, वंदना जांबिलसा, रोजलिन यंगड, रुचिता सुतार, स्नेहलता मोरे, ज्योती राजपूत, चेतना सोनेरी, दिनेश ठाकरे, कुशाल शर्मा यांनी परिश्रम घेतले.



