*कोकणातील कुणबी समाजाच्या 23 व्या नोंदणी अभियान आणि मार्गदर्शन शिबीरला वधूवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकणातील कुणबी समाजाच्या 23 व्या नोंदणी अभियान आणि मार्गदर्शन शिबीरला वधूवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*कोकणातील कुणबी समाजाच्या 23 व्या नोंदणी अभियान आणि मार्गदर्शन शिबीरला वधूवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
मुंबई(प्रतिनिधी):-कोकणातील कुणबी माणसानं कोकणस्थ कुणबी वधूवरांसाठी 23 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात आलेल्या 23 व्या नोंदणी अभियान मार्गदर्शन शिबीराला मिळालेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. या शिबिराला प्रमुख पाहूणे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष प्रो. रविंद्र खानविलकर उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय निवाते, शांताराम कुदळे, संगमेश्वर तालुक्यातील समाजसेवक नितेश गोताड उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सिध्दीविनायक वधूवर केंद्राच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच डॉ.श्रुतिका शिंदे, बी.ए.एम. एस., त्वचातंज्ञ, (माणगाव,रायगड के) कु. कार्तिकी कांबळे मास्टर ऑफ फार्मसी (तळा माणगाव) यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वधूवरांचे प्रबोधन करताना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष प्रो. रविंद्र खानविलकर सर यांनी थोतांड कुंडली पाहून लग्न जमविणे कसं चुकीचे आहे. यावर प्रबोधन विचार मांडले.सौ. सविता चिपकर बी.ए., एम.एस. डब्लू (एनजीओ) यांनी भाषणपर विचार मांडताना असे सांगितले की पुर्वी कोकणातील लोकांकडे जन्मपत्रिका नव्हत्या त्यावेळी लग्न जमविताना लोक नावरस जमवित होते, त्याकाळात कोणताच प्रश्न उद्भवला नाही मग आपण पत्रिका पाहाण्यासाठी एवढा हट्ट का करतो ? असं त्यांनी सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवराम जांभळे यांनी असे सांगितले की 22 नोंदणी अभियान अंतर्गत कुंडलीवर प्रबोधन केल्याचा परिणाम बऱ्याच समाजबांधवावर होऊ त्यांनी कुंडली न पाहण्याचा निर्णय घेऊन पंसतीवर भर देऊ लग्न जमविली त्यामुळे पालकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले श्री सिद्धिविनायक वधूवर सुचक केंद्राच्या वतीने आजपर्यंत कोकणातील जिल्ह्यातील कुणबी इच्छुक वधूवरांची 23 यशस्वी नोंदणी अभियान आणि मार्गदर्शन शिबिरे संपन्न झाली असून त्याला समाज बांधव मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून पालक आपली ओळख एकमेकांना प्रत्यक्ष भेटून करून देतात, या कार्यक्रमाच्या माध्यमातून वधू-वरांची माहिती संकलन करून सुयोग्य, मनपसंत, जीवनसाथी मिळवून देण्याचे काम आम्ही करीत आहोत. त्याप्रमाणे इच्छुक तरुण, तरुणींना आणि पालकांना योग्य अपेक्षा ठेवण्यासंदर्भात तसेच शास्त्रीय दृष्टिकोना ठेवा, जन्मकुंडली पाहाणे निव्वळ थोतांड आहे. यांची उदाहरणे देऊन केंद्रातर्फे समुपदेशन (काऊन्सेंलिग) करण्यात येते.
आजपर्यंत 45 वर्षाच्या प्रवासात जवळजवळ हजारों यशस्वी विवाह जमले आहेत. याचे सर्व श्रेय माझ्या समाजबांधवांना असून मी फक्त निमित्त आहे. या सामाजिक सेवेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, आणि मुंबई उपनगर या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात पोहोचवलो आहोत. लोक आग्रहास्तव आम्ही लवकरच 24 वे नोंदणी अभियान आणि मार्गदर्शन शिबिर श्री सिद्धिविनायक वधूवर सुचक केंद्र (रजि) मुंबई यांच्यावतीने दि. सोशल सर्व्हिस शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मुंबई 400012 येथे आयोजित करत आहोत. नांवे नोंदणीसाठी शिवराम जांभळे 8928067597 / 9869507866 या नंबरवर संपर्क करावा.



