*नंदुरबार येथे‘खेलो इंडिया युवा संवाद’उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे‘खेलो इंडिया युवा संवाद’उत्साहात संपन्न*
*नंदुरबार येथे‘खेलो इंडिया युवा संवाद’उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर माय भारत केंद्र,नंदुरबार आणि राष्ट्रीय सेवा योजना, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘खेलो इंडिया युवा संवाद’ कार्यक्रम आज जी.टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच जे.ई.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नंदुरबार येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक, माय भारत स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खेळाडू यांना राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाशी जोडण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माय भारत व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी संबोधनाचे थेट प्रक्षेपण उपस्थित युवकांनी पाहिले. कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचे स्वागतपर भाषण तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनावरील आणि क्रीडा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर आधारित लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले.
पंतप्रधानांच्या संबोधनानंतर आयोजित ‘युवा संवाद’ सत्रात युथ आयकॉन आणि खेळाडू यांच्यात संवाद, तसेच युवकांच्या कल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा जाणून घेण्यासाठी खुल्या संवादाचे आयोजन करण्यात आले. या संवादातून युवकांनी क्रीडा क्षेत्रातील संधी, क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका याबाबत आपले विचार मांडले. यानंतर कार्यक्रमादरम्यान ‘विकसित भारत नशामुक्त’ शपथ, माय भारत पोर्टलवर नोंदणीचे आवाहन आणि आभार प्रदर्शन करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला जी. टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी, आशिष सैनी, हितेश सोनवणे, कुणाल भट, भूषण पाटील, सुलतान पवार, जितेंद्र पाटील, मनोज शेवाळे, व ज्ञानेश्वर तडवी यांची तर जे. ई. एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे डॉ. विजय गोराणे, कु, भाव्या गवळी, सौरभ राजपूत, कु. सुरेखा पावरा, तुषार पाडवी, विजय सूर्यवंशी, अक्षय अहिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. क्रीडा क्षेत्रातील प्रगती, युवकांचा सक्रिय सहभाग आणि राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माय भारत केंद्र, नंदुरबार आणि राष्ट्रीय सेवा योजना, नंदुरबार यांच्या वतीने सर्व सहभागी युवक, स्वयंसेवक, महाविद्यालयीन प्रशासन, खेळाडू व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.



