*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
*ओणी येथील एक कोटी खर्चाची कोव्हिड उपचार केंद्राची इमारत विनावापर पडून*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील ओणी येथील कोरोना काळामध्ये सुरू झालेल्या कोविड उपचार केंद्राची इमारत गेल्या तीन-चार वर्षांपासून विना वापर तसेच पडून उभी आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी अशा पद्धतीने वाया जात असेल तर त्याचा काय उपयोग हे एक प्रकारे जनतेचे नुकसानच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधीतरी वेळी देऊन राजापूरच्या सार्वजनिक प्रश्नाकडे लक्ष देतील का ?असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
सुरुवातीला ही जागा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. मात्र कोरोना आल्यामुळे या काळामध्ये राजापूर तालुक्यातील लोकांना वेळेवर उपचार व्हावेत म्हणून लाखो रुपये खर्च करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना covid उपचार केंद्र म्हणून या इमारतीची पायाभरणी झाली. 30 खाटांच्या कोव्हीड उपचार केंद्रासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सुमारे 90 लाख रुपये या इमारतीसाठी खर्च करण्यात आले होते. या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, रत्नागिरी जिल्ह्यातील त्यावेळीचे पालकमंत्री अनिल परब, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, त्यावेळी जे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आदी मान्यवर उपस्थित होते. सध्या या इमारतीची दुरावस्था झालेली दिसून येत आहे. आजुबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पाऊस पडत असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर रान वाढले आहे. सगळीकडे अस्वच्छता आहे. सध्या ही इमारत जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या अखत्यारीत येत आहे. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी तरी या इमारतीबाबत आढावा घेतला होता का असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे. खरं तर या जागेवर ट्रॉमा केअर सेंटर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी किंवा सोनोग्राफी युनिट किंवा योगासन कार्यशाळा घेण्यासाठी आदींसाठी उपयोगात येऊ शकते. मुंबई गोवा अपघातग्रस्त रुग्णांसाठी तातडीचे उपचार म्हणून स्वतंत्र इमारतीचा वापर होऊ शकतो. किंवा रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा म्हणून देखील इमारत वापरात आणता येऊ शकते. मात्र त्यासाठी विद्यमान शासनकर्त्यांची इच्छा असेल तर. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा. थोडीफार दुरुस्ती आवश्यक असल्यास ती दुरुस्ती करून घ्यावी.अनावश्यक खर्च टाळावा. आणि लवकरात लवकर ही इमारत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ओणी परिसरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.



