*"एक राखी सैनिकांसाठी' उपक्रमातून जवानांना राखी" प्रकाशा कन्या शाळेत ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत राखी तयार करण्याची कार्यशाळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"एक राखी सैनिकांसाठी' उपक्रमातून जवानांना राखी" प्रकाशा कन्या शाळेत ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत राखी तयार करण्याची कार्यशाळा संपन्न*
*"एक राखी सैनिकांसाठी' उपक्रमातून जवानांना राखी" प्रकाशा कन्या शाळेत ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत राखी तयार करण्याची कार्यशाळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा, प्रकाशा येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत राखी तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स अँड गाईडस्, मुंबई तथा नंदुरबार भारत स्काऊट्स अँड गाईडस् यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद नंदुरबार उपशिक्षणाधिकारी(योजना) तथा जिल्हा चिटणीस युनूस पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे आणि केंद्रप्रमुख मनोज पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद केलेल्या 21 व्या शतकातील कौशल्यांचा विकास, व्यावहारिक कौशल्ये, चांगल्या सवयी आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. शासन परिपत्रक प्रमाणे आनंददायी शनिवार कृति पुस्तिकेतील मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांच्या मानसिक, सामाजिक व भावनिक विकासाबरोबरच आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, नवनिर्मिती आणि ताणतणाव व्यवस्थापनाची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. मुलींनी सहभाग घेतला. मुलींनी राख्यांसोबतच सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढविणारे तसेच त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे संदेशही लिहिले, देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांमुळेच आपण सण- उत्सव आनंदात साजरे करू शकतो विद्यार्थ्यांमध्ये जवानांविषयी आदर, आपुलकी आणि कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे शिक्षक गोपाल गावीत यांनी सांगितले
या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षिका प्रियंका पाटील यांनी सीसीआरटी राणी लक्ष्मीबाई क्लब, कब बुलबुल विद्यार्थिनींना राखी तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थिनींनी विविध आकर्षक राख्या स्वतः तयार केल्या. या कृतीमधून विद्यार्थिनींमध्ये हस्तकला कौशल्य, सर्जनशीलता, नवनिर्मितीची वृत्ती आणि आत्मविश्वास विकसित झाला.
श्रावण महिन्यातील भाऊ-बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत रक्षाबंधनासोबत ‘वृक्षबंधन’ या संकल्पनेलाही प्रोत्साहन देण्यात आले. भाऊ- बहिणींचे नाते अधिक दृढ करण्याबरोबरच वृक्षसंवर्धन व पर्यावरणप्रेमाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी तयार करण्यात आलेल्या राख्यांपैकी काही राख्या भारतीय जवानांना पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी सांगितले. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता आणि देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम विशेष ठरला.
कार्यक्रमास शांतीलाल मुथा फाउंडेशनचे मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक निखिल चौधरी, तालुका समन्वयक अंबादास भिलावे यांनी वर्गभेट देऊन मुल्यवर्धन उपक्रम सुरू आहे. त्याबाबत मुलींशी चर्चा केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, शिक्षक गोपाल गावीत, शिक्षिका नूतन पाटील, प्रियंका पाटील यांच्यासह शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत तयार केलेल्या रंगीबेरंगी राख्यांमुळे शाळेचे वातावरण आनंदमय व उत्साहपूर्ण झाले.



