*मौजे विखरण येथील शिवाजी नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत, 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मौजे विखरण येथील शिवाजी नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत, 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन*
*मौजे विखरण येथील शिवाजी नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत, 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील मौजे विखरण येथील शिवाजी नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन विखरण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना विखरण येथील स्थानिक नागरीक विष्णू वामनराव मराठे यांनी दिले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील मौजे विखरण येथील शिवाजी नगर परिसरामध्ये गटारींची नियमित स्वच्छता व देखभाल होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी गटारीतून रस्त्यावर वाहत आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, डासांचे प्रमाण वाढणे तसेच विविध संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, सदर सांडपाणी रस्त्यावरून वाहत जाऊन लगतच्या शेतामध्येही साचत असल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, पिकांवर विपरीत परिणाम होत आहे, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 नुसार ग्रामपंचायतीवर गावातील स्वच्छता, सांडपाणी निचरा, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छ परिसर राखण्याची जबाबदारी आहे, तसेच भारत सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बंधित (Tied) निधीचा वापर सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनासाठी प्राधान्याने करणे बंधनकारक आहे. असे असतानाही शिवाजी नगर परिसरातील गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले असून या कामासाठी बंधित निधीचा प्रभावी वापर करण्यात आलेला दिसत नाही. त्यामुळे सदर ठिकाणाची तात्काळ पाहणी करून 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून गटारींची स्वच्छता, दुरुस्ती, सांडपाण्याचा कायमस्वरूपी निचरा तसेच आवश्यक अभियांत्रिकी उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अन्यथा या प्रकरणाची तक्रार गटविकास अधिकारी, पंचायत समिती नंदुरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हाधिकारी नंदुरबार, विभागीय आयुक्त तसेच संबंधित लेखापरीक्षण व दक्षता प्राधिकरणाकडे करून 15 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराची चौकशी, संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर प्रशासकीय कारवाई तसेच कर्तव्यातील कसूरबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येईल, याची गंभीर दखल घेऊन 7 दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही करावी. अन्यथा पुढील सर्व जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाची राहील असे, निवेदन
ग्रामविकास अधिकारी
ग्रामपंचायत विखरण यांना शिवाजी नगर परिसरातील नागरिक यांनी दिले आहे.



