*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ग्रुप ग्रामपंचायत घाटली, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथील विकास कामांमध्ये सन 2021-22 ते सन 205-26 या कालावधीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचा 6 जुलै 2026 रोजीचा चौकशी अहवाल प्रमाणित प्रत मिळणे व चौकशी अहवालामध्ये भ्रष्टाचार, शासकीय निधीचा अपहार किंवा कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचे निष्षण झाल्यास संबंधित सरपंच, ग्रामसेवक व इतर दोषी व्यकींविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act, 1988), महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 (कलम 39 व 169) आणि भारतीय न्यायसंहिता (BNS) / भारतीय दंड संहिता (IPC) मधील कलम 409 (अपहार), 467, 471 (बनावट कागदपत्रे) नुसार फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कठोर कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना 30 कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रुप ग्रामपंचायत घाटली, ता. धडगाव जि. नंदुरबार येथे सन 2021-22 ते सन 2025-26 या कालावधीत विविध विकास कामांमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार, शासकीय निधीचा अपहार, विकास कामांमध्ये अनियमितता, बनावट नोंदी करणे व शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना 8 जून 2026 रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार प्रकरणाची दिनांक 6 जुलै 2026 रोजी चौकशी करण्यात आली आहे, 6 जून 2026 रोजीचा चौकशी अहवालाची प्रमाणित प्रत तात्काळ उपलब्ध करून द्यावी. चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या सरपंच, ग्रामसेवक व इतर संबंधित अधिकारी/कर्मचान्यांविरूद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून शासनाची रक्कम वसूल करण्यात यावी. दोर्षीवर विभागीय कारवाई, निलंबन, पदच्युती व इतर कायदेशीर कारवाई तातडीने करण्यात यावी.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व वेळेत चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सीईओ नमन गोयल यांनी दिले आहे.



