*धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा–विद्यार्थ्यांना न्याय द्या*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा–विद्यार्थ्यांना न्याय द्या*
*धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा–विद्यार्थ्यांना न्याय द्या*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील विविध सामाजिक, आदिवासी, विद्यार्थी व लोकशाहीवादी संघटनांनी एकत्र येत धडगाव तहसील कार्यालयासमोर शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला.
आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवर तातडीने योग्य निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर पुढील काळात अधिक व्यापक आणि तीव्र लोकशाही आंदोलन उभारण्यात येईल.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि न्याय मागण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकला गेला पाहिजे आणि संवादातून प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. दडपशाही हा लोकशाहीचा मार्ग नाही. भारतीय संविधान हे देशातील सर्वोच्च आहे. सत्ता येते आणि जाते, पण संविधान, लोकशाही मूल्ये आणि कायद्याचे राज्य कायम असते. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचा सन्मान राखून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.



