*घरमालक छतावर झोपला, अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घरमालक छतावर झोपला, अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास*
*घरमालक छतावर झोपला, अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास*
शहादा(प्रतिनिधी):-शहादा शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शहरातील श्रीहरी नगर परिसरात मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना घडली असून, घरमालक कुटुंबासह छतावर झोपलेले असतानाच चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लाखमोलाच्या भावना लुटून नेल्या.
आज, सोमवार दिनांक १३ जुलै, मच्छिंद्र वैदू हे आपल्या कुटुंबासह रात्री छतावर झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 5 ग्रॅमचे मंगळसूत्र, मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवलेली तब्बल 1 किलो चांदी आणि 3 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल लंपास केला. या चोरीने केवळ दागिने गेले नाहीत, तर एका कष्टकरी बापाची अनेक वर्षांची स्वप्नेही चोरट्यांनी हिरावून नेली आहेत. मच्छिंद्र वैदू यांनी कर्ज काढून घर बांधले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करत कर्जाचे हप्तेही फेडत आहेत. मुलीच्या लग्नासाठी हळूहळू साठवून ठेवलेली चांदी एका रात्रीत चोरीला गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील मंदिरावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला वेग देण्यात आला आहे. या परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छिंद्र वैदू यांनी चोरांना लवकरात लवकर अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
शहादा शहरात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता पोलिस हे चोरटे किती लवकर जेरबंद करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. घरमालक छतावर झोपला. अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास! शहादा
शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शहरातील श्रीहरी नगर परिसरात मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना घडली असून, घरमालक कुटुंबासह छतावर झोपलेले असतानाच चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लाखमोलाच्या भावना लुटून नेल्या. मच्छिंद्र वैदू हे आपल्या कुटुंबासह रात्री छतावर झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 5 ग्रॅमचे मंगळसूत्र, मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवलेली तब्बल 1 किलो चांदी आणि 3 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल लंपास केला. या चोरीने केवळ दागिने गेले नाहीत, तर एका कष्टकरी बापाची अनेक वर्षांची स्वप्नेही चोरट्यांनी हिरावून नेली आहेत. मच्छिंद्र वैदू यांनी कर्ज काढून घर बांधले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करत कर्जाचे हप्तेही फेडत आहेत. मुलीच्या लग्नासाठी हळूहळू साठवून ठेवलेली चांदी एका रात्रीत चोरीला गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील मंदिरावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला वेग देण्यात आला आहे. या परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छिंद्र वैदू यांनी चोरांना लवकरात लवकर अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
शहादा शहरात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता पोलिस हे चोरटे किती लवकर जेरबंद करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



