*पदवी घेऊन मुंबईला नाही, तर शेतात गेली राजापूरची धनश्री*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पदवी घेऊन मुंबईला नाही, तर शेतात गेली राजापूरची धनश्री*
*पदवी घेऊन मुंबईला नाही, तर शेतात गेली राजापूरची धनश्री*
राजापूर(प्रतिनिधी):-दहावी- बारावी झाल्यावर नोकरीसाठी मुंबई-पुण्याचा मार्ग धरणं ही आजची पद्धत झाली आहे. पण राजापूर तालुक्यातील तळवडे गावच्या धनश्री शिवाजी रबसे यांनी या प्रवाहाविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला. शेती पदवीधर झाल्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित जमिनीवर शेती करण्याचा निर्धार केला. सुमारे पाच एकर क्षेत्रात धनश्री सध्या बारमाही भाजीपाला लागवड करतात. पिकवलेला भाजीपाला विकण्यासाठी त्या बाजारपेठेच्या मागे गेल्या नाहीत. थेट रस्त्यालगत स्वतःचा स्टॉल उभा करून गावकऱ्यांना आणि प्रवाशांना ताज्या भाज्या विकायला सुरुवात केली. यामुळे मध्यस्थ नको, ग्राहक थेट शेतकऱ्याकडून खरेदी करतो आणि शेतकऱ्यालाही योग्य भाव मिळतो. या वाटचालीत आई- वडिलांचं सहकार्य धनश्रीला मोठं बळ देऊन गेलं. वडिलांच्या मदतीने त्यांनी शेतीकडे केवळ पारंपारिक काम म्हणून न पाहता, एक शास्त्रीय व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली.
शिक्षण घेऊनही शेतात राबणं आणि स्वतःच विक्रीची व्यवस्था करणं पसंत करणाऱ्या धनश्रीची ही वाटचाल आजच्या तरुण पिढीसाठी नवा आदर्श ठरू शकते.



