*जामदा प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा,प्रशासनचे धाबे दनानले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जामदा प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा,प्रशासनचे धाबे दनानले*
*जामदा प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा,प्रशासनचे धाबे दनानले*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील काजिर्डा-जामदा परिसरात प्रस्तावित जामदा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे.प्रशासनाकडून केवळ आज पर्यंत आश्वासनांची खैरात केली जात असल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी मंगळवार 26 मेपासून गावातच राणे वाडी रस्त्यावर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात जामदा प्रकल्प संघर्ष समिती काजिर्डा- राणेवाडीच्या वतीने सोमवारी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदने सादर करण्यात आली आहेत. तहसीलदार राजापूर यांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. जामदा प्रकल्पासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जामदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाने जाहीर केलेल्या 100 टक्के पुनर्वसन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थांच्या बैठका घेऊन ग्रामसभांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. मात्र शासनाच्या निकषांनुसार निर्णय होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.काही अधिकाऱ्यांकडून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला असून त्यामुळे गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येत 26 मे रोजी उपोषण आंदोलन छेडण्याचा निर्णय मान्य केला. दरम्यान, काजिर्डा- राणेवाडी मार्गावर सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन करण्यात सुरुवात केली. निवेदनात नमूद करण्यात आल्या प्रमाणे प्रशासनाने तातडीने दखल घेवून आंदोलन जागी पोलीस यंत्रना पाठवण्यात आली. परंतू आंदोलन कर्तांच्या मागण्या मान्य न करता आदी पूर्णवसन मग धरन ह्याला पोलिस यंत्रनाने झिडकारून देवून कायदा आणि सुव्यस्था बाजूला सारून आंदोलन कर्त्यांचे म्हणने न जुमानता अधिकारी वर्गाने हाताच्या बोटावर मोजणारे फुटीरवादी यांना साथ देत आंदोलन कर्त्याच्या मधून पोलीस गाडीचा वापर करून अन्य गाड्या गावामध्ये मोजनी साठी घेवून गेले. त्यामूळे आंदोलन आता मात्र अजून चिघळण्याच्या मार्गावर आहे. असे दिसून येत आहे.आमच्या मागण्या जर का पूर्ण नाही केल्या तर आम्ही जामदा प्रकल्पग्रस्त येवढ्या वर थांबू शकत नाही. असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाची प्रत अन्य अन्य अधिकारी वर्गांना देवूनआमदार किरण सामंत यांनाही देण्यात आली आहे. सदर आंदोलन मध्ये माजी सरंपच, चंद्रकांत शिंदे, नितीन काजारे, पिंट्या आर्डे, पिंट्या गुरव, मंगेश नारकर चंद्रकांत सावंत, कृष्णा आर्डे, प्रदिप चंदूरकर, दिपक पालकर, व बारक्या मांडवकर, तुकाराम नारकर, विनोद आर्डे, गोपाळ पालकर, व अन्य महिला वर्ग आंदोनलमध्ये सहभागी झाल्या होत्या.



