*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*
*दोन वर्ष रखडलेला मुर गावचा पुल अजून सुद्धा अपूऱ्या अवस्थेतच*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातिल मूर या गावी चार ते पाच गावांना जोडनारा रस्ता या रस्त्यावरती मूर कोलते वाडी नदीवरती होवू घातलेला पुल तब्बल दोन वर्ष होवून तिसरे वर्ष लागले तरी आज तगायत तो पुल पूर्णतेकडे जाईल की नाही ह्या कडे सर्व गावांचे लक्ष लागून राहिले आहे.
दोन वर्ष अपूऱ्या अवस्थेत राहिलेला पुल कॉन्ट्रॅक्टर राजेश सावंत यांनी दीवाळीच्या आस पास काम चालू केले. त्याला आज तब्बल सहा / सात महिने झाले. तरी बांधकाम अपुरेच आहे. त्या फुलाची दोन्ही बाजूची साईड बांधकाम करण्याची अपूरीच आहे. बांधकाम करणारे कामगार वर्ग दिवसभर काम न करता बसून असतात. त्यांना विचारले असता आम्ही काम कसे करायचे मटीरीअल व मसनरी आम्हाला जाग्यावरती मिळत नाही तर काम कसे करायचे असे सांगण्यात येत आहे. ह्याकडे बांधकाम विभागाचे सुद्धा लक्ष नाही. असे दिसून येत आहे. गेले तिन वर्ष अनेक तक्रारी करून सुद्दा कोणीही प्रशासन जागे होत नाही. त्यामूळे सर्व जनतेचे आता असे बोल आहेत की ह्या पुलाच्या कारभारामध्ये अनेक दिग्गज मोठ्या माणसांचे हात आहेत की काय असा सवाल विचारला जात आहे. अवकाळी पाऊस चालू झाला आहे. जर का हा पाऊस मोठ्या प्रमाणात चालू झाला तर चार / ते पाच गांव दळन वळन पासून वंचीत रहाणार हे मात्र नक्कीच. पंधरा मे नंतर कोणत्याही रस्त्यावरती डांबर घातले जात नाही. हा बांधकाम खात्याचा नियम आहे. कारण ते डांबरी करण पाऊसा मूळे टीकू शकत नाही. ते सर्व उकसून वरती येवू शकते. असे असताना हा पुल अजून बांधकामा स्वरूपात सर्व संभ्रमात आहे. मूर कोलते वाडी हा पुल जर का झाला नाही तर पाचल बाजार पेठेशी संबंदीत असलेले हे गाव त्यांचा वाहतूकीचा संपर्क तुटणार आहे. तसेच आता पंधरा दिवसात शाळा, कॉलेजे चालू होतिल त्यामुळे शाळकरी मुलांचे मोठे हाल होणार. ह्यात काय शंका नाही. असे झाल्यास कोळंब, काजिर्डा, राणेवाडी, जांभवडे, मूर वरचीवाडी, मूर शेटयेवाडी, गुरव वाडी, साळवी वाडी, अशा अनेक जनतेचे दळण वळणाचे हाल होणार आहेत. तेंव्हा ह्या दोन दिवसात जर का पुलाचे काम चालू करून पूर्णतेकडे न नेल्यास सर्व जनता जनार्धन एकवटून प्रशासनचे व कॉन्ट्रॅटरचे झाकलेले डोळे उडण्यासाठी वेळ लागणार नाही असा इशारा जनता देत आहे.



