*पेंडखळे धनगरवाडीतील ग्रामस्थांची जगण्यासाठी धडपड, रस्ता पाणी समस्या सोडविण्याची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पेंडखळे धनगरवाडीतील ग्रामस्थांची जगण्यासाठी धडपड, रस्ता पाणी समस्या सोडविण्याची मागणी*
*पेंडखळे धनगरवाडीतील ग्रामस्थांची जगण्यासाठी धडपड, रस्ता पाणी समस्या सोडविण्याची मागणी*
राजापूर(प्रतिनिधी):-प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दि.11 मे 2026 रोजी मौजे पेंडखळे गावातील धनगर वाडी येथे श्री सत्य नारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती अभिजित गुरव, सुनिल माळी (कोकणातील नामांकित यूट्यूबर), राजाराम खानविलकर, पेंडखळे गावचे पोलीस पाटील - विजय चिपटे, राजेश गुरव (पंचायत समिती सदस्य) उपस्थित होते. यावेळी पेंडखळे गावातील ग्रामस्थांना धनगरवाडीतील मंडळींनी की केळवडे फाटा ते शिंदे वाडी (धनगर वाडी) पर्यंत रस्ता लवकर डांबरी करण करावे आणि पाणी पिण्यासाठी बोअरवेल किंवा विहीरीची सोय करावी अशी कळकळीची मागणी केली आहे.
पाणी पिण्यासाठी पाणी मुबलक उपलब्ध नाही मार्च महिन्यापासून पाण्याची पातळी कमी होते. रस्ता खराब असल्यामुळे पेंडखळे गावात रेशन घेण्यासाठी 25-30 किलोमीटर फिरून जावे लागते.
धनगरवाडी- कोंडवाडी-खरावते -राजापूर-केळवडे मार्गे पेंडखळे असा प्रवास करावा लागतो. केळवडे फाटा ते धनगर वाडी रस्ता साधारण 2 ते 3 किमी आहे परंतु पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असल्याने चालत जाणे फार मुश्कील होऊन जाते गावात पाणी, रस्ता नाही तसेच शाळाही 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असल्याने शाळेत जाणे अवघड जाते त्यामुळे येथे मुले नाहीत मुलभूत सोयी सुविधा अभावी अनेक कुटुंबांनी इतर ठिकाणी शहरात स्थलांतर केले आता गावांबरोबर धनगरवाडी ओस पडू लागली आहे सदर रस्त्याची व पाण्याची गंभीर समस्या सोडवून धनगरवाडीला न्याय द्यावा अशी मागणी महापूजे निमित्त उपस्थित असलेल्या पाहुण्यांकडे ग्रामस्थांनी केली आहे.



