*प्रकाशा गावात जनगणनेची जोरदार तयारी,16 प्रगणक सज्ज, राष्ट्रीय मोहिमेला गती,नागरिकांनी सहकार्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रकाशा गावात जनगणनेची जोरदार तयारी,16 प्रगणक सज्ज, राष्ट्रीय मोहिमेला गती,नागरिकांनी सहकार्याचे आवाहन*
*प्रकाशा गावात जनगणनेची जोरदार तयारी,16 प्रगणक सज्ज, राष्ट्रीय मोहिमेला गती,नागरिकांनी सहकार्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय आणि सांख्यिकीय उपक्रमांपैकी एक असलेल्या जनगणनाच्या पार्श्वभूमीवर शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात जनगणना कार्याला सुरुवात झाली असून या महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी गावात एकूण 16 प्रगणक कार्यरत आहेत. शहादा तालुक्याचे तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशा गावाचे ग्रामविकास अधिकारी बी. जी. पाटील यांनी सर्व प्रगणक, पर्यवेक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या कार्याबद्दल विश्वास व्यक्त केला.
भारतामध्ये 1872 पासून जनगणना केली जात असून 2027 मधील जनगणना ही देशातील 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना ठरणार आहे. या जनगणनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच माहिती संकलन डिजिटल माध्यमातून करण्यात येणार आहे. “भारताची जनगणना 2027 -एचएलओ” या मोबाइल अॅपद्वारे प्रगणक घराघरांत जाऊन माहिती गोळा करणार आहेत. यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होणार असून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे.
जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिल्या टप्प्यात (2026) घरयादी व घरगणना केली जाणार आहे. यामध्ये घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि मालमत्तेची माहिती संकलित केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात (2027) लोकसंख्या गणना करण्यात येईल, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती निश्चित वेळेनुसार नोंदवली जाईल. यंदाच्या जनगणनेत स्व-गणनेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना वेब पोर्टलद्वारे स्वतःची माहिती भरता येणार असून प्रगणकांकडून त्याची पडताळणी केली जाणार आहे.
जनगणनेद्वारे मिळणारी माहिती ही शासनाच्या विविध योजना, संसाधनांचे वाटप, मतदारसंघांचे परिसीमन तसेच सामाजिक व आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे प्रगणकांची भूमिका केवळ माहिती गोळा करण्यापुरती मर्यादित नसून ते राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देत आहेत.
ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील यांनी सांगितले की, “प्रगणकांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम केल्यास ही जनगणना यशस्वी होईल आणि गावाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल.” तसेच गावातील नागरिकांनी प्रगनकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले.



