*कृषी सखींनी घेतले जैविक निविष्ठा उत्पादनाचे धडे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषी सखींनी घेतले जैविक निविष्ठा उत्पादनाचे धडे*
*कृषी सखींनी घेतले जैविक निविष्ठा उत्पादनाचे धडे*
नंदूरबार(प्रतिनिधी):-कृषी विज्ञान केंद्रात दोन दिवसीय कृषी सखी यांचे नैसर्गिक शेतीवर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व आत्मा, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यात नैसर्गिक शेतीवर अभियान राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणजे कृषी सखींचे प्रशिक्षण या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आत्माचे प्रकल्प संचालक, दीपक पटेल, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सी यु डी पाटील उपस्थित होते, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत राजेंद्र दहातोंडे यांनी कृषी क्षेत्रात महिलांना मोठे स्थान आहे याच अनुषंगाने नैसर्गिक शेतीत प्रत्यक्ष बदल घडवून आणण्याचे काम या कृषी सखीच करू शकतात या अनुषंगाने प्रत्यक्ष आपापल्या परिसरात इतर शेतकऱ्यांना सुद्धा नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान सांगावं या दोन दिवसीय प्रशिक्षणात प्रत्यक्षात नैसर्गिक शेतीचे घटक म्हणजेच जैविक निविष्ठा उत्पादन शिकून घेऊन आपापल्या परिसरामध्ये ते शेतकऱ्यांसाठी अवलंब करावा जेणेकरून बाहेरून कृषी निविष्ठा न आणता शेतकऱ्यांनी आपल्या घरी दहा ड्रम थेरीच्या माध्यमातून निविष्ठा उत्पादन कराव्यात व जा जा कृषी सखींनी खूप चांगल्या पद्धतीने निविष्ठा तयार केलेल्या आहेत, त्या इतरांनीही बघाव्यात जेणे करून प्रत्यक्ष आपापल्या ठिकाणी त्या बनविता येतील व येत्या खरीप हंगामासाठी त्या निविष्ठा वापराव्यात असे त्यांनी आवाहन केले. दीपक पटेल यांनी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेतीचे अभियान येत्या खरीफ हंगामासाठी पुढे कसे नेण्यात येईल यासाठी कृषी सखी यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, आपापल्या स्तरावर ज्या पण अडचणी येतील त्या अडचणी आपण सर्वजण सोडून शेतकऱ्यांसाठी काम करणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून रासायनिक खतांचा वापर कमी करता नैसर्गिक निविष्ठांचा वापर जास्तीत जास्त करावा याचबरोबर येत्या हंगामासाठी या अभियानात निवड झालेल्या शेतकऱ्यांकडे प्रत्यक्षात पेरणी पासून तर कापणी पर्यंत वेळोवेळी भेटी देऊन नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान त्यांचा बांधापर्यंत कसं पोहोचेल यावर लक्ष देणं अति महत्त्वाच आहे. याचबरोबर यावर्षी कमी पावसाच्या अंदाज वर्तविला आहे या अनुषंगाने येत्या काळात जीवामृत व बिजामृत च्या माध्यमातून शेतीची सुरुवात करावी असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. त्यानंतर तांत्रिक सतरची सुरुवात करताना कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यु डी पाटील यांनी येत्या खरीप हंगामासाठी नैसर्गिक शेतीच्या निविष्ठा कशा पद्धतीने बनविता येतात व त्याच्या प्रत्यक्षात वापर कसा करावा जेणेकरून रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक घटकांचा वापर करून पिकाचे अधिक उत्पादन काढण्यासाठी प्रथम जमिनीला अथवा मातीला सुपीक करणे अती महत्वाचे यात, तसेच आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये 10 ड्रम थेरी कशापद्धतीने करवी यावर मार्गदर्शन केले. खुशाल राठोड यांनी नैसर्गिक शेतीला पशुधनाची जोड कशी असली पाहिजे यासाठी देशी गायचे संगोपन कसेे करावे यावर त्यांनी मार्गदर्शन केले पद्माकर कुंदे यांनी नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या जैविक खते बीज प्रक्रिया व नैसर्गिक पद्धतीने कीड व रोगाचे नियंत्रण कसे करावे यावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी सौ. आरती देशमुख यांनी कृषी सखीना वुमन्स टेक्नॉलॉजी पार्क येथे भेट देऊन नैसर्गिक शेती उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग कशा पद्धतीने करता येऊ शकतो यावर मार्गदर्शन केले जयंत उत्तरवार यांनी स्पायरल सेपरेटरच्या माध्यमातून हरभरा बियाण्याची प्रतवारी यावर प्रात्याशिक करून दाखविले. त्या नंतर कृषी सखींनी जीवामृत, बीजामृत, अग्निश्र व ब्रह्मास्त्र प्रत्यक्षात कसे बनवितात याचे प्रात्यक्षिक केले व प्रत्यक्ष पिकामध्ये जाऊन कशा पद्धतीने जीवामृत व निमाश्रचा वापर करतात याचेही प्रात्यक्षिक केले, या प्रशिक्षणाला एकूण 54 कृषी सखींच्या सहभाग होता कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्यक्ष शेतावर काम करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल यावर चर्चात्मक सत्र घेण्यात आले शेवटी कृषी सखीनी आपले अनुभव कथन केले व सौ रूपाली गिरासे कृषी सखी यांनी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम झाला व आम्हाला काही अडचणी असतील त्यावर आम्हाला नियमित मार्गदर्शन राहील असे त्यांनी सांगून आभारी मानले, अशा पद्धतीने दोन दिवसीय कृषी सखींचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.



