*जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट,कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी-मधुरा सुर्यवंशी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट,कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी-मधुरा सुर्यवंशी*
*जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट,कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी-मधुरा सुर्यवंशी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यांत सध्या तापमानाचा पारा सामान्य पातळीपेक्षा अधिक वाढला आहे. उष्णतेच्या लाटेची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विभागाने कामगारांच्या आरोग्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले असून जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यावसायिक आणि कारखानदारांना तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्रीमती मधुरा सूर्यवंशी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. श्रम व रोजगार मंत्रालय, नवी दिल्ली आणि कामगार उप आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रांनुसार, उष्णतेच्या तीव्रतेमुळे कामगारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत:
कामगार आणि उद्योगांसाठी महत्त्वाच्या सूचना,
कामाच्या वेळेत बदल: दुपारी जेव्हा उष्णता सर्वाधिक असते, त्या काळात काम टाळण्यासाठी कामाच्या तासांचे पुन्हा नियोजन करावे. कामाचा वेग: उष्णतेमुळे कामगारांना थकवा जाणवू शकतो, अशा वेळी आवश्यकतेनुसार कामाचा वेग कमी करण्याची सवलत द्यावी. पाणी आणि विश्रांती: कामाच्या ठिकाणी पुरेसे पिण्याचे पाणी आणि कामगारांना विश्रांती घेण्यासाठी थंड व सावलीच्या जागेची व्यवस्था करावी. आरोग्य सुविधा, आपत्कालीन परिस्थितीसाठी 'आईस पॅक' आणि उष्णतेपासून संरक्षण देणारे साहित्य उपलब्ध असावे. तसेच, आरोग्य विभागाच्या मदतीने कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करावी.
कारखाने आणि खाण व्यवस्थापनासाठी विशेष नियम, सर्वाधिक उष्णतेच्या वेळी कामगारांना सक्तीची विश्रांती द्यावी. दोन व्यक्तींचा गटाने काम करण्याची व्यवस्था करणे. कामगारांना इलेक्ट्रोलाईट पूरक पेये (उदा. ओआरएस, लिंबू सरबत) उपलब्ध करून द्यावीत.
उष्णतेच्या लाटेमुळे होणारे धोके आणि त्यावरील प्रथमोपचारांबाबत कामगारांमध्ये जागरूकता निर्माण करावी. जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. असेही सरकारी कामगार अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



