*दावेदारांच्या शेतजमिनीवर त्यांना पेरण्यास त्रास झाल्यास लोकसंघर्ष मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा-प्रतिभा शिंदे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दावेदारांच्या शेतजमिनीवर त्यांना पेरण्यास त्रास झाल्यास लोकसंघर्ष मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा-प्रतिभा शिंदे*
*दावेदारांच्या शेतजमिनीवर त्यांना पेरण्यास त्रास झाल्यास लोकसंघर्ष मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा-प्रतिभा शिंदे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-"अक्कलकुवा तालुक्यातील वनजमिन दावेदारांचा मेळावा संपन्न. दावेदारांच्या शेतजमिनीवर त्यांना पेरण्यास त्रास झाल्यास लोकसंघर्ष मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा." प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वन जमीन धारकांचा मेळावा लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुंभारखान फाटा येथे घेण्यात आला. यावेळी मोठया संख्येने वनजमिन दावेदार महिला व पुरुष उपस्थित होते.
वनजमिन धारकांवर आजवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी वन हक्क कायदा 2005 पारित झाल्यावर पिढ्यानपिढ्या पासून वन जमीन कसणाऱ्या आदिवासींना त्यांच्या जमिनींवर हक्क मिळणार असे वाटले होते मात्र अजूनही हजारो वन जमीन धारकांचे दावे कायद्यातील प्रक्रिया न पाळता तसेच प्रलंबित आहेत मात्र दुसरीकडे वन विभाग जिल्हा प्रशासनाच्या मदतीने खाजगी कंपन्यांना वन जमीन हस्तांतरित करत आहे व वृक्ष लागवड च्या नावाखाली या प्रलंबित दावेदारांच्या शेत जमिनीत रोजगार हमीच्या नावाखाली खड्डे खोदून त्यांना त्यांच्या शेत जमिनीतून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. नवापूर, अक्कलकुवा तालुक्यात अश्या घटना घडल्याने वनविभागाला व जिल्हा प्रशासनाला इशारा देण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील कुंभारखान फाटा येथे लोकसंघर्ष मोर्चा चा आजचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलतांना संघटनेच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी "वन विभाग अथवा जिल्हा प्रशासन यांना इशारा दिला. "ज्या दावेदारांचे दावे प्रलंबित आहेत किंवा ज्यांचे दावे चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवले आहेत त्या सर्वांना योग्य सुनावणी होऊन न्याय मिळत नाही तो पर्यंत कुठल्याही प्रकारच्या कारणासाठी त्यांच्या ताब्यातील शेत जमिनीत शेतीची कामे व पीक पेरणीसाठी विरोध करता कामा नये जर कोणी तसा मज्जाव करत असेल तर जिल्हाप्रशासनाने त्यांना योग्य ते संरक्षण दिले पाहिजे मात्र प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाने कुठलीही जबाबदारी न घेता विविध योजनांच्या नावाखाली प्रत्यक्षात वन विभागाला मोकळी सूट दिली आहे व स्थानिक पातळीवर वन विभागाचे कर्मचारी जेसीबी मशीन शेतात घालून दडपशाही करत आहे. कुठल्याही आदिवासी वन जमीन धारकावर जर अन्याय झाला तर लोकसंघर्ष मोर्चा शांत बसणार नाही संवैधानिक मार्गाने आम्ही त्याचा तीव्र प्रतिकार करू असे त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यात काथा वसावे, रमेश नाईक, अशोक पाडवी, धनसिंग वसावे, भानुदास, आदी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी सर्वांनी आपापल्या गावात जागृत रहावे व वेळ पडल्यास जिल्हा कार्यालयावर ठिय्या आंदोलनासाठी तयार रहावे असे आवाहन केलं.



