*अर्धापूरच्या ‘त्या’ 102 शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश, खा. अशोक चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी वेधले लक्ष*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अर्धापूरच्या ‘त्या’ 102 शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश, खा. अशोक चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी वेधले लक्ष*
*अर्धापूरच्या ‘त्या’ 102 शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यवाहीचे निर्देश, खा. अशोक चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी वेधले लक्ष*
नांदेड(प्रतिनिधी):-सन 2025 -26 मधील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या अर्धापूर येथील 102 शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार हमी योजना विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार, अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात आले होते. यात खचलेल्या किंवा बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 'मनरेगा'च्या माध्यमातून मदत देण्याची तरतूद होती. अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील 102 बाधित शेतकऱ्यांनी यासाठी रीतसर अर्ज करून पंचनामेही पूर्ण केले होते. मात्र, 'मनरेगा' ही योजना केवळ ग्रामीण क्षेत्रापुरती मर्यादित असल्याने आणि अर्धापूर हे नगरपंचायत (शहरी) क्षेत्र असल्याने, तांत्रिक कारणास्तव या शेतकऱ्यांची मदत प्रलंबित राहिली होती. बाधित शेतकरी नगरपंचायत हद्दीतील असला तरी त्याचे नुकसान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांइतकेच गंभीर आहे. केवळ तांत्रिक निकषांमुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित राहणे अन्यायकारक ठरेल. राज्य सरकारने विशेष पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भक्कम आधार दिला आहे. अर्धापूरचे 102 शेतकरी त्या मदतीपासून वंचित राहणे योग्य ठरणार नाही, असे खा. अशोक चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नमूद केले. या बाबीची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत रोहयो विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.



