*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
*मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या महामार्ग जनआक्रोश समितीची आग्रही मागणी*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-गेल्या 17 वर्षांपासून मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणातील जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. अपूर्ण रस्ते, खड्डे, अपूर्ण पूल, सततची वाहतूक कोंडी आणि अपघातांची भीती यामुळे हजारो नागरिकांचे हाल झाले आहेत. या काळात लोकांचा अमूल्य वेळ वाया गेला, इंधनाचा अतिरिक्त खर्च झाला आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही सहन करावे लागले. जनतेने एवढा मोठा त्रास सहन करूनही आता पुन्हा टोलच्या नावाखाली पैसे उकळले जाणे हे अजिबात मान्य होणार नाही. मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफीच द्या अशी ठाम मागणी महामार्ग जनआक्रोश समितीने शासनाकडे केली आहे. जर करारानुसार टोल भरावाच लागत असेल तर तो सरकारने स्वतःच्या निधीतून भरावा जनतेवर हा अन्यायकारक बोजा टाकू नये. हा प्रश्न केवळ काही लोकांचा नाही, तर संपूर्ण कोकणातील जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार ते मंत्री अशा सर्व लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन या मागणीसाठी ठाम आवाज उठवावा.
अन्यथा ज्या दिवशी टोल सुरू होईल त्या दिवशी टोलनाक्यावर गाड्या उभ्या करा आणि एकानेही टोल भरू नका.
काम वेळेत केले असते तर प्रकल्पाचा बोजा इतका वाढला नसता. सरकारच्या चुकीचा त्रास कोकणकरांनी का सहन करावा? प्रत्येक कोकणकर 17 वर्षांचा त्रास विसरणार नाही अन्यायकारक
टोल आम्हाला मान्य नाही असे महामार्ग जनआक्रोश समितीने म्हटले आहे.



