*बच्चू कडू यांच्या मोझरी येथील बेमुदत अन्नत्याग उपोषणाच्या मागण्या मान्य करा, प्रहार शिक्षक संघटने मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बच्चू कडू यांच्या मोझरी येथील बेमुदत अन्नत्याग उपोषणाच्या मागण्या मान्य करा, प्रहार शिक्षक संघटने मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन*
*बच्चू कडू यांच्या मोझरी येथील बेमुदत अन्नत्याग उपोषणाच्या मागण्या मान्य करा, प्रहार शिक्षक संघटने मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, तथा माजी राज्यमंत्री हे दि. 8 जुन 2025 पासुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यात मौजे मोझरी येथील समाधी स्थळासमोर विविध मागण्या मंजुर करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. तरी ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात. याकरिता नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीमती मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात यावेत यासाठी महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, तथा माजी राज्यमंत्री यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनातील मागण्या मान्य कराव्यात. दिव्यांग व विधवा महिलांना रुपये 6000 मानधन देण्यात यावे. आपल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांना संपुर्ण कर्ज माफी देण्यात यावी. शेतमालाला एमएसपी (हमीभाव) वर 20 टक्के अनुदान देण्यात यावे. दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्त प्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे. युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे. तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पद संख्याच्या जाहिराती प्रसिध्द करण्यात याव्या. शहरा प्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरीता समान निकष लावून किमान रुपये 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे. शेतकऱ्या प्रमाणे शेत मजुरांच्या अपघाती मृत्यु झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे तसेच शेत मजुराकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे. पेरणी व कापणी पर्यंत मजुरीची सर्व कामे एमएसपी मध्ये घेण्यात यावे तसेच फळ पिकांना 3.5 रेषो लावुन दुग्ध व्यावसाय सुध्दा एमएसपी ला जोडण्यात यावा. हे जर होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर एकरी 10,000 मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा. ज्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येते त्याच प्रमाणे शेणखताला/सेंद्रीय खताला अनुदान देण्यात यावे. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण करुन त्यांचे प्रश्न मार्गी लावावे. मनरेगा मधील मजुरी रुपये 312 वरुन रुपये 500 करण्यात यावी. निवासी अतीक्रमण नियमाकुल करण्यात यावे. दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गायींच्या दुधासाठी बेस रेट रुपये 50 प्रती लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रुपये 60 प्रती लिटर मिळावा. कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान 40 रुपये बाजार भाव होई पर्यंत निर्यात बंदीचा निर्णय करु नये. सन 2025 - 26 या वर्षासाठी ऊस पिकाला प्रती टन 4300 रुपये दर 1 टक्के रिकव्हरी बेस रेट धरुन मिळावा. तसेच पुढील 11 टक्के रीकव्हरीसाठी 430 रुपये एफआरपी दर मिळावेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करुन रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी व 15 दिवसामध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसुल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावे. तरी ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, तथा माजी राज्यमंत्री यांच्या वरील रास्त मागण्या मान्य करून त्यांचे चालू असलेले अन्नत्याग आंदोलन सोडवावे. याबाबत माहितीस्तव निवेदनाची प्रत ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, तथा अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य,माजी शालेय शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ई-मेल मार्फत पाठवण्यात आली आहे.