*आष्टा ग्रामपंचायतच्यावतीने गुणवंताचा सन्मान सोहळा संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आष्टा ग्रामपंचायतच्यावतीने गुणवंताचा सन्मान सोहळा संपन्न*
*आष्टा ग्रामपंचायतच्यावतीने गुणवंताचा सन्मान सोहळा संपन्न*
लातूर(प्रतिनिधी):-ग्रामपंचायत कार्यालय आष्टाचे लोकनियुक्त सरपंच सावता पंडु गायकवाड (माळी) यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातुन आष्टा गावातील तरुण होतकरू मुला, मुलींना प्रेरणा मिळावी व गावाचे नावलौकिक वाढवण्यात मोलाची कामगिरी बजावणार्या मुला, मुलींना शाबासकी देणं हे गावाचे प्रथम नागरिक म्हणून आमचं आद्य कर्तव्य आहे या भावनेतून सरपंच सावता पंडु गायकवाड (माळी) यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले. त्यानिमित्ताने कला, क्रीडा, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सावता माळी हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच भानुदास राठोड, ग्रामपंचायत अधिकारी योगीराज पांचाळ, मुख्याध्यापक अंकुश बिडवे, मनोज अष्टेकर हे होते तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, लहान थोर मंडळी , समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रिडाक्षेत्र कुस्ती विष्णु तातपुरे, महेश तातपुरे, विनोद कामाळे, खोखो राष्ट्रीय संघात सहभाग धनश्री गायकवाड, सानिया पटेल. सामाजिक क्षेत्रात अंकुश बिडवे भगतसिंग विद्यालय आष्टा शाळेचा 100 टक्के निकाल, बालाजी जाधव महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटना लातुर यांच्यातर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत, सोपान सुर्यवंशी, अर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शाळा प्रवेशासाठी सहकार्य व मार्गदर्शन, तुकाराम अलट नाशिक विभागीय संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान पुरस्कार सोहळ्यात संत गाडगेबाबा महाराज सामाजिक सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या इ.10 वी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक गायकवाड शंतनु किरण, द्वितीय क्रमांक शेळके गायत्री सिताराम, तृतीय क्रमांक निकम अमित अनिल, निकम ज्योत्सना शिवदीप, चौधरी प्रसाद बालाजी, स्नेहा उदय फुले, सार्थक सचिन वळसंगे, शार्दुल बळीराम वळसंगे, अंजली अनिल चौधरी, ऋषीकेश रमाकांत कलाडले, प्रगती पवन बिराजदार, डांगे गोवर्धन राम, गायकवाड श्रद्धा एकनाथ, संध्याराणी विष्णू शेळके, गायकवाड अमरजा ज्ञानेश्वर, जाधव कृष्णा दिलीप, चैतन्य विजयकुमार शेळके, तेजश्री उद्धव गायकवाड, अक्षरा कैलास निटुरे, विश्वजीत विठ्ठल गायकवाड, सय्यद अरहान इमरान, गायकवाड युवराज वैजनाथ, शिंदे गणराज तुकाराम तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत शासकीय नोकरी मिळवलेले गुणवंत विद्यार्थी खटावकर सागर रंगनाथ (क्लर्क मुंबई हायकोर्ट) वळसंगे आकाश लक्ष्मण (आरोग्य विभाग लातूर), रत्नाकर माणिकराव मुळे (मुंबई मेट्रो), माधुरी विनायक मुळे (पोस्टमन अमरावती) अशा तब्बल 34 गुणवंतांचा सत्कार सरपंच, समस्त ग्रामस्थांच्या वतीने शाल, पुष्पहार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित हनुमंत गायकवाड, सुभाष मुळे, राम डांगे, गोविंद मुळे, चांदपाशा पठाण, रमाकांत कलाडले, बाळासाहेब कदम, सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड, जनार्दन निकम, फिरोज पटेल, विनायक मुळे, बब्रुवान डांगे, माणिक मुळे, नारायण बिराजदार, सोपान सूर्यवंशी, विजयकुमार क्षिरसागर ,पुंडलिक गायकवाड, सचिन वळसंगे, शब्बीर सय्यद, राम बिराजदार, दयानंद मुळे, श्याम आसोले, अंगद चव्हाण, संपतराव शिंदे, तेलंगे सर, प्रल्हाद गायकवाड, गणेश अष्टेकर, तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर गुणवंत विद्यार्थी घडवण्यामध्ये गावात सेवा देत असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचा सिंहाचा वाटा असल्याने उपस्थित ग्रामस्थ तसेच सरपंच यांनी सर्वांचा सन्मान केला व अशीच आष्टा गावाची सेवा करुन गावचे भविष्य उज्ज्वल बनवावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मनोगत पवन बिराजदार, मारोती मुसने सुत्रसंचालन तुकाराम अलट, आभार बळीराम वळसंगे यांनी मानले.