*"पारंपरिक इरले, घोंगड्या झाल्या दुर्मिळ,प्लास्टिकच्या वस्तू खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"पारंपरिक इरले, घोंगड्या झाल्या दुर्मिळ,प्लास्टिकच्या वस्तू खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल*
*"पारंपरिक इरले, घोंगड्या झाल्या दुर्मिळ,प्लास्टिकच्या वस्तू खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल*
राजापूर(प्रतिनिधी):-भात पेरणीला सुरुवात झाली की पूर्वी कोकणात उत्साह संचारत असे घरातील पुरुषाच्या सोबतीला घरधनीन आणि लहान पोरेही शेतात जात आगोट सरताना पावसाची सुरुवात झाली की नांगरटीसाठी लागणाऱ्या ईशाड, रुमणी, कुदळ, खोरे, ढेपला आदी साहित्याबरोबर इरले, घोंगड्या सुध्दा बाहेर काढल्या जात, पूर्वी शेत नांगरताना मळ्यामध्ये इरले डोक्यावर घेतलेल्या स्त्रिया व घोंगडी घेऊन जोत हाकणारे जोतये हे चित्र हमखास दिसायचे परंतु आधुनिक काळात प्लास्टिकचा वापर वारेमाप वाढला कमी किमतीत मिळणाऱे रेनकोट, प्लास्टिक टोप्या, डोक्यावर घेतले जाणारे कागद यामुळे पारंपरिक इरले व घोंगड्या नामशेष होत चालल्या प्लास्टिकच्या वस्तू पावसापासून बचाव करत असल्या तरी इरले, घोंगड्या पांघरल्यावर मिळणारी ऊब व संरक्षण प्लास्टिक पासून मिळत नाही पळसाची पाने, बांबू आणि अंबाडयाचे सूत (दोरा) आदी वस्तूंपासून इरल्याची वैशिष्ट्यपूर्ण विणली केली जाते त्यामुळे इरले घेतलेल्या स्त्रियांचे पावसापासून संरक्षण तर होतेच परंतु ऊबही मिळते आणि इरले, घोंगडी विकणाऱ्या कारागीरांना रोजगार मिळत असे परंतु काळाच्या ओघात इरले, घोंगड्यांची जागा प्लास्टिकच्या वस्तूंनी घेतली कोकणातील गावागावात शेतमळ्यावर डोईवर घोंगडी घेतलेला शेतकरीराजा आणि इरले पांघरलेल्या स्त्रिया हे मनमोहक चित्र भावी पिढीला केवल पुस्तकात बघायला मिळेल यात शंका नाही.