*विहरीत पडल्याने शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विहरीत पडल्याने शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू*
*विहरीत पडल्याने शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू*
सुरगाणा(प्रतिनिधी):-सुरगाणा तालुक्यातील करंजाळी येथील तेरा वर्षीय मुलीचा ठक्कर बापा योजनेच्या विहीरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सविता शिवाजी भोये वय 13 वर्षे हि मुलगी निफाड तालुक्यातील मुखेड येथील आदिवासी आश्रम शाळेत सहाव्या इयत्तेत शिकत होती. सविताच्या घराजवळ ठक्कर बापा योजनेच्या विहीरीचे सुमारे चार वर्षांपासून बांधकाम ठेकेदारा मार्फत सुरू आहे. सबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सुचना देऊन ही विहरीचे बांधकाम करीत नाहीत. विहीर सविताच्या घराजवळ असल्याने सविता शेतात जात असतांना पाय घसरुन विहरीत पडल्याने ती बुडाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विहीर खोल असल्याने पोहणा-या पाणबुड्यांनी शव बाहेर काढले. तिला सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासा अंती मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. परिसरात हळहळत व्यक्त केली जाते आहे.
करंजाळी गावात सुमारे चार वर्षांपासून कळवण प्रकल्पा मार्फत ठक्कर बापा योजनेची विहर फक्त खोदकाम करून ठेवली आहे. तिचे बांधकाम अद्याप पूर्ण न केल्याने माझ्या मुलीला जीव गमवावा लागला आहे. या पुर्वी ही अनेक वेळा गायी, बैल, जनावरे विहरीत पडले आहेत. अधिका-यांनी याची सखोल चौकशी करुन सबंधित हलगर्जीपणा करणा-या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी. त्याचा काळ्या यादीत समावेश करावा. शिवाजी भोये.