*कोकण रेल्वेच्या "राजापूर रोड" स्थानकावर मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस व नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मंजूर करण्याबाबत आ. सदाभाऊ खोत यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण रेल्वेच्या "राजापूर रोड" स्थानकावर मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस व नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मंजूर करण्याबाबत आ. सदाभाऊ खोत यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन*
*कोकण रेल्वेच्या "राजापूर रोड" स्थानकावर मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस व नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मंजूर करण्याबाबत आ. सदाभाऊ खोत यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन*
राजापूर(प्रतिनिधी):-कोकण रेल्वे प्रकल्पाची उभारणी होताना कोकणवासीयांचा मोलाचा सहभाग राहिला असून अनेक स्थानिक रहिवाशांनी आपली जमीन या प्रकल्पासाठी अर्पण केली आहे. परंतु आजवर कोकण रेल्वेचा प्रत्यक्ष लाभ कोकणातील नागरिकांना अपेक्षित प्रमाणात मिळताना दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील "राजापूर रोड" हे स्थानक कोकण रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून, येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्या अनुषंगाने मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस व नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांचा राजापूर रोड स्थानकावर थांबा निश्चित करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे. तसेच, सदर स्थानकासाठी रेल्वे तिकीट आरक्षणाचा कोटा वाढवावा, अशीही मागणी आहे. याबाबत पंचक्रोशी ग्रामविकास समिती, राजापूर (मुंबई) यांच्यावतीने आमदार सदाभाऊ खोत यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्र व्यवहार केल्यानंतर त्यांनी तात्काळ देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे वरील गाड्यांचा राजापूर रोड स्थानकावर थांबा सुरू करण्याबाबत शिफारस करून आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. कोकण रेल्वेमार्गावरील राजापूर रोड रेल्वे स्थानक हे कोकणच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसराच्या जवळ असून रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसंख्येने घनदाट असलेल्या भागास सेवा पुरवते. राजापुर हे स्थानक रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, चाकरमानी तसेच आंबा व काजू व्यापाऱ्यांसाठी अत्यंत सोयीचे असल्याकारणाने वरील गाड्यांचा थांबा मंजूर होण्याकरिता पुढील केंद्रीय स्तरावर रेल्वे विभागाशी पंचक्रोशी ग्रामविकास समिती सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांचे खासगी सचिव व पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे यांनी माध्यमांना दिली आहे.